शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

राज्यातील नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:24 IST

राज्यात सत्तासंघर्षाचे राजकरण सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यात अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले असून, हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून राज्यातील विविध नवनिर्वाचित आमदार आप-आपल्या मतदारसंघात दौरे करताना पाहायला मिळत आहे. तर झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे मागणी सुद्धा या आमदारांकडून करण्यात आली आहे.

राज्यात सत्तासंघर्षाचे राजकरण सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने मका, बाजरी, तुरी, कपाशी पिकांचे करोडो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहेत. शेतात पाणी तुंबल्याने मका व बाजरीच्या कणसांना कोंब फूटले तर कपाशीचे पिक पाण्यामुळे पिवळी पडले आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना पाहायला मिळत आहे.

ज्या भागात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत. जवळपास त्या भागातील सर्वच आमदार शेतकऱ्याच्या मदतीला धावून येत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्ष पाहता सरकार स्थापनेपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. मात्र आमदारांच्या रेट्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनाम्याला सुरवात केली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.