शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविलेले संशयास्पद पत्र पुण्यातील खडकीतून..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 21:17 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश..

ठळक मुद्देपुणे पोलिसांकडे कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही.... साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दु भाषेत...

पुणे : भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या भोपाळ येथील घश्री पोस्टाद्वारे मिळालेले संशयास्पद पत्र हे पुण्यातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पत्रावर शिवाजी चौक, खडकी बाजार, खडकी, ता़. जिल्हा पुणे, महाराष्ट्र, इंडिया असा पत्ता दिला आहे. स्वामी रामचंद्र अय्यर ईश्वरचंद असे पत्र पाठविणाऱ्यांचा उल्लेख पत्रावर करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पुणे पोलिसांकडे कोणत्याही यंत्रणेने अद्यापपर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीबाबत तक्रार आलेली नाही, अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल, असे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञासिंह यांना पाठविण्यात आलेले हे पत्र उर्दु भाषेत लिहिलेले आहे. या पत्रासोबत दोन पुड्यांमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आहे. या पावडरला हात लावल्यामुळे खाज सुटत असल्याचे तपासात समोर आले आहे. या पाकिटातून पाठविलेल्या पत्राबरोबर आणखी काही पाने असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटोंचाही समावेश आहे. त्यावर लाल पेनाने संशयास्पद खुणा करण्यात आलेल्या आहेत. तसेच फोटोसमोर या सर्वांवर बंदुक रोखल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच भोपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्र व त्यासोबत आलेली पावडर ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांकडे अशा पत्राबाबत कोणत्याही यंत्रणेने अद्याप पर्यंत संपर्क साधला नाही. तसेच चौकशीसाठीही तक्रार आलेली नाही. अशी तक्रार मिळाल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल,असे विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मितेश घट्टे यांनी सांगितले.-------------------------------------------------हे एका पाकिटातून पाठविलेले साधे पत्र आहे. त्यामुळे त्याची नोंद नसल्याचे या पत्राचा टपाल खात्यात त्याची नोंदणी नसते. त्यामुळे या पत्राचा माग काढणे अवघड असते. शहरातील टपाल पेट्या किंवा टपाल कार्यालयात जमा होणारी पत्रे गोळा केली जातात. त्या टपालांचे राज्य, गावांनुसार वेगळी केली जातात. त्यावर शिक्के मारुन नंतर ती आरएमएस विभागाकडे पाठविली जातात. आरएमएस विभागाकडून संबंधित गावांकडे ही पत्रे पाठविली जातात. साधे पत्रांची नोंद नसल्याने ते पत्र नेमके कोणी पाठविले याची नोंद नसते.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीSadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरPoliceपोलिस