शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
शिवसेनेत आमदारकीच्या तिकीटासाठी २०-२० कोटींची मागणी; लक्ष्मण हाकेंचा शिंदेंवर गंभीर आरोप
3
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
4
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
5
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
6
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
7
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
8
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
9
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
10
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
11
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
12
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
13
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
14
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
15
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
16
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
17
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
18
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
19
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
20
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार

शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयुक्त

By admin | Published: November 07, 2016 1:35 AM

जागतिक स्तरावरील बलाढ्य देशांमध्येदेखील शाश्वत अर्थव्यवस्था आणि सर्वांगीण विकास साधणारी अर्थव्यवस्था याबाबत गोंधळाचे वातावरण दिसते

पुणे : जागतिक स्तरावरील बलाढ्य देशांमध्येदेखील शाश्वत अर्थव्यवस्था आणि सर्वांगीण विकास साधणारी अर्थव्यवस्था याबाबत गोंधळाचे वातावरण दिसते. सर्वांच्या नीती टोकाच्या अवस्थेला येऊन ठेपल्या आहेत. अशा वेळी शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशींनी मांडलेले शाश्वत विकासाचे मॉडेलच उपयोगी पडेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले.‘शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ या वसुंधरा काशीकर-भागवत लिखित पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालकमंत्री गिरीश बापट, साहित्यिक राजीव साने, वसुंधरा काशीकर-भागवत, राजहंस प्रकाशनाच्या संपादक विनया खडपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेच्या माजी अध्यक्ष व महिला आघाडीच्या माजी आमदार सरोज काशीकर होत्या.गडकरी म्हणाले, ‘‘शेतीमधील गुंतवणूक कमी करून उत्पादन कसे वाढेल, या दृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे. शरद जोशींपासून ते अनेक विचारवंतांनी खुली अर्थव्यवस्था शेतीला तारकच ठरेल, अशी ठाम भूमिका घेतली म्हणून शेतकरी, कष्टकरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे स्पर्धा निर्माण झाली आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारताना भारताने सर्वसामान्य, गरीब माणूस केंद्रस्थानी ठेवला. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान २० टक्के एवढे अल्प असले, तरी ग्रामीण आणि कृषी अर्थनीतीच्या सक्षमीकरणाशिवाय सर्वांगीण प्रगती होणे शक्य नाही. शरद जोशी अर्थक्रांतीचा जो विचार मांडत होते, त्या विचारांची आज नितांत आवश्यकता आहे. सिंचनासारख्या आवश्यक घटकांच्या बाबतीतदेखील महाराष्ट्र पिछाडीवर आहे. सिंचन कसे वाढेल, संशोधन कसे वाढेल, जे प्रकल्प निधीअभावी बंद आहेत आणि जे पाण्याशी, शेतीशी संबंधित आहेत ते पूर्णत्वाला कसे नेता येतील, याबाबत केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. महाराष्ट्राला त्यातून ३९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.सरोज काशीकर म्हणाल्या की, समस्यांचे राजकारण करीत आपली पोळी भाजून घेणारे राजकारणी आम्ही आजवर पाहिले, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खऱ्या अर्थान पोटतिडकीने काम करणारा शरद जोशींसारखा नेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य होते. सरकार स्वत: समस्यांच्या जंजाळात अडकलेले आहे, ते काय आपले प्रश्न सोडवणार आपल्यालाच आपले प्रश्न सोडवावे लागतील, अशा विचारांचे कार्यकर्ते शरद जोशी यांनी घडविले. वसुंधरा काशीकर-भागवत यांनी शरद जोशी यांच्याशी झालेल्या संवादातून या पुस्तकाचा कसा जन्म झाला, याबाबत सविस्तर विवेचन केले. प्रसन्न जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार भक्ती हुबळीकर यांनी मानले.