शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

“मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांकडे द्यावी, कारण की...”; राजू शेट्टींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:36 PM

Raju Shetti News: अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Raju Shetti News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू पाटील आत्मक्लेश यात्रा काढत आहेत. शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच या यात्रेदरम्यान राजू शेट्टी यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे म्हटले जात आहे. 

ऊसाचा मागच्या वर्षीचा दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा, यासाठी ही आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही. तर यंदाचा ऊस गळीत हंगामा सुरू करून देणार नाही, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तसेच कारखान्यात वजन काटे डिजिटल करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या यात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवारांकडे द्यावी

राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रे अजित पवार यांच्या हातात द्यावीत. अजित पवार हे साखर कारखानदारांचे कैवारी आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, काही दिवसांआधी राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांना सरकारमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. सध्याच्या सरकारमध्ये, सत्तेत काहीही उरलेले नाही. सरकारमधून बाहेर पडा. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात लढा देऊ. शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरू, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. 

दरम्यान, या आवाहनानंतर बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर काही कयासही राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. बच्चू कडू यांनी राजू शेट्टी यांच्या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी ही पदयात्रा तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे