शहरं
Join us  
Trending Stories
1
वानखेडेवर भारतीय संघाचं 'ग्रँड सेलिब्रेशन', कोहली-रोहितचं 'इमोशनल स्पीच'! जाणून घ्या, कोण काय बोललं?
2
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
3
Fake T20 World Cup Trophy : व्हिक्ट्री परेडमध्ये रोहित शर्मा अँड कंपनीच्या हाती 'डुप्लिकेट' वर्ल्ड कप ट्रॉफी! पण का...? जाणून थक्क व्हाल
4
अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
5
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
6
जन्मदात्या मातांनाच मुलांनी घातला गंडा, एकाने तर खोटी आईच उभी केली; फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
7
सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...
8
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
9
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
10
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
11
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
12
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
13
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
14
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
15
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
16
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
17
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
18
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
19
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
20
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार

Raju Shetty: ठाकरे सरकारला धक्का! स्वाभीमानी शेतकरी संघटना 'मविआ'मधून बाहेर; राजू शेट्टींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 6:56 PM

राज्यात महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

कोल्हापूर-

राज्यात महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे शेतकऱ्यांसाठी पुन्हा रस्त्यावर उतरुन लढाई लढणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. 

गेल्या दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारला सोडचिठ्ठी देणार असल्याचं म्हटलं जात होतं. तसे संकेतच राजू शेट्टी यांनी दिले होते. अखेर आज राजू शेट्टी यांनी याची अधिकृत घोषणा केली आहे. "मी आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं जाहीर करतो की मविआ आणि आमचे सगळे संबंध संपले आहेत. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ त्यांना ही परिस्थिती सांगू. दिल्लीवाल्यांनी फसवलं आणि मुंबईवाल्यांनीही फसवलं. आता आम्हाला आमच्या मनगटावर न्याय मिळवून द्यायचाय", असं राजू शेट्टी म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आता राजू शेट्टींची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

 राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार होते, मात्र राज्यपालांनी आक्षेप घेतल्याने त्या यादीतूनही त्यांचे नाव वगळण्यात आले होते. तेव्हापासून शेट्टी आणि महाविकास आघाडी यांच्यातला संघर्ष वाढला होता. महाविकास आघाडीने दिलेले वचन पाळले नाही, असा थेट आरोप राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आला होता. त्यानंतर आज राजू शेट्टी यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी