शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Sanjay Raut: तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू, संजय राऊतांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:50 IST

तहव्वूर राणा प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणले असून त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे. याच पार्श्वभूभीवर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी राणाला भारतात आणले गेले आहे. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात, असेही ते म्हणाले. संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

तहव्वूर राणा प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, तहव्वूर राणाला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू आहे. बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधी राणाला फासावर चढवतील आणि या मुद्द्याचा निवडणुकीपूर्वी प्रचारासाठी वापर करतील. भाजपवाले सगळे मुहूर्त बघून निर्णय घेतात,  असेही संजय राऊत म्हणाले.

सत्ताधारी पक्षाने श्रेय घेऊ नये- राऊतराणाला भारतात आणले गेले असेल तर प्रशासनाचे आणि तपास यंत्रणांचे कौतुक केले पाहिजे, त्यासाठी भाजपने श्रेय घ्यायचे कारण काय आहे? काँग्रेसच्या काळातच राणाला भारतात आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती, त्यामुळे सत्ताधारी पक्षाने श्रेय घेऊ नये. राणाच्या आधी अबू सालेम यालाही अशाच प्रक्रियेतून भारतात आणण्यात आले होते, असा टोला संजय राऊतांनी अप्रत्यक्ष भाजपला लगावला. भाजपला जर राणाचे श्रेय घ्यायचे असेल तर त्यांनी पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घेतले पाहिजे, भाजपने पाकिस्तामध्ये अडकलेल्या कुलभूषण जाधवांनाही परत आणावे, असेही संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र