शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

Nawab Malik: राज्यात दंगे भडकविणाऱ्या वसीम रिजवीवर कारवाई करा; नवाब मलिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 12:49 PM

Nawab Malik Talk on Amravati, Nanded, Malegaon Violence: अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. काही लोक कारस्थाने रचत आहेत. त्याला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.

त्रिपुरामध्ये झालेल्या कथित घटनेचे पडसाद अमरावती, नांदेड, मालेगावात उमटले. मशीद पाडल्याच्या निषेधार्थ मुस्लिमांनी बंद पाळला होता. त्यामध्ये हिंसा झाली. या हिंसाचाराची आम्ही कठोर शब्दात निंदा करतो. वसीम रिजवी हा शिया बोर्डामध्ये अफरातफर करणारा आरोपी आहे. त्याने हिंसा घडविण्यासाठी वक्तव्ये केली, त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. 

तसेच आंदोलन करण्याचा लोकांचा अधिकार आहे. ज्यांनी आंदोलन पुकारले त्यांनी आंदोलनाचे नियोजन केलं पाहिजे. हिंसाचाराला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. वसीम रिजवी हे देशातील सलोखा बिघडेल यासाठी विधान करतात. त्यांनी शिया बोर्डाने अफरातफर केली, याची तक्रार झाली. याचा तपास सुरू असून, अद्याप यावर कारवाई झालेली नाही. या रिझवीवर तात्काळ कारवाई करण्याची आमची मागणी असल्याचे मलिक म्हणाले. 

 

अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे लोकांनी शांतता ठेवली पाहिजे. काही लोक कारस्थाने रचत आहेत. त्याला लोकांनी बळी पडू नये. समीर वानखेडेंच्या जातीच्या दाखल्याबाबतचे प्रकरण न्यायालयात आहे. आमची बाजू आम्ही न्यायलयासमोर मांडली असल्याचे मलिक म्हणाले.  

टॅग्स :nawab malikनवाब मलिकAmravatiअमरावतीMalegaonमालेगांव