शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचाही ‘तमाशा’

By admin | Published: February 28, 2016 2:27 AM

तमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे.

- सुदीप गुजराथी, नाशिकतमाशा कलावंताच्या पोटी जन्माला येऊन, उपेक्षेचे कढ पचवून शिकू पाहणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागत असल्याची विदारक बाब समोर येत आहे. अनेक होतकरू तरुण-तरुणींना निव्वळ जातीच्या दाखल्याअभावी शिक्षण सोडून पुन्हा आपल्या मूळ व्यवसायाकडे परतावे लागत असल्याने इच्छा असूनही त्यांना या चक्रव्यूहातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तमाशा कलावंतांना भोगाव्या लागणाऱ्या हाल-अपेष्टांमुळे निदान आपली मुले तरी या व्यवसायात पडू नयेत, असे अनेकांना वाटते. हे कलावंत वर्षातले सहा-आठ महिने फिरतीवर असल्याने दौऱ्यातच त्यांची लग्ने जुळतात आणि त्यांना मुलेही होतात. या कलावंतांत जवळपास सगळेच विवाह आंतरजातीय होतात. अनेकांच्या घरातून लग्नाला विरोध असतो. दोघांचे कुटुंबीय हा विवाह स्वीकारत नसल्याने घरातून कोणतीही कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत. त्यातच अनेकदा पुरुष विवाहानंतर महिलांना वाऱ्यावर सोडून देतात. अशा महिला आपल्या मुलांना शाळेत घालताना त्याच्या नावापुढे पतीचे नाव लावतात; मात्र जात स्वत:ची लावतात. या मुला-मुलींना दहावीपर्यंत अडचण जाणवत नाही. महाविद्यालयीन व उच्चस्तरीय शिक्षणात मात्र आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला अनिवार्य असतो. जातीचा दाखला मिळवण्यासाठी अनुसूचित जाती (एससी) व जमातीच्या (एसटी) विद्यार्थ्यांना सन १९४९ पूर्वीचा, भटक्या-विमुक्तांना (एनटी) सन १९६१ पूर्वीचा, तर इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) सन १९६७ पूर्वीचा त्यांच्या पूर्वजांच्या जन्मतारीख व जातीचा पुरावा आवश्यक असतो. या मुलांच्या पित्याचाच ठावठिकाणा नसल्याने त्यांच्याकडे सध्याची कागदपत्रेही नसतात, तर पन्नास वर्षांपूर्वीची कागदपत्रे कोठून मिळवावीत, असा प्रश्न त्यांना पडतो. अनेकदा शिक्षणाचे शुल्क भरण्याची ऐपत नसल्याने तमाशा कलावंतांच्या मुलांवर अर्ध्यावरच शिक्षण सोडण्याची वेळ येत आहे. राज्यात तमाशाची १० ते १५ मोठी मंडळे आहेत, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १५-२० लहान पार्ट्या आहेत. या सगळ्या कलावंतांच्या मुलांची हीच व्यथा असून, तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी किमान ५० वर्षे पूर्वीच्या पुराव्याची अट तरी रद्द करावी, अशी मागणी होत आहे. इच्छा असूनही... सरकार दरबारी हेलपाटे मारल्यावर, जातपडताळणी समितीने गावात येऊन खात्री केल्यानंतर माझ्या मुलांना जातीचा दाखला मिळाला; पण वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही. अशीच तऱ्हा असंख्य कलावंतांच्या मुला-मुलींची आहे. त्यामुळे शिक्षण घेताना त्यांना अडचणी येतात. सरकारने त्यांच्यासाठी काही अटी शिथिल कराव्यात.- सोनाली महाडिक, नांदूरशिंगोटे