शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

तामिळनाडूत दारुबंदीची सुरुवात, महाराष्ट्राचे काय?

By admin | Published: May 24, 2016 3:31 AM

तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी दारूबंदीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात हे कधी होणार, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला

औरंगाबाद : तामिळनाडूच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री जयललिता यांनी दारूबंदीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात हे कधी होणार, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारताच जयललिता यांनी सोमवारी पहिल्याच दिवशी दारूची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानेही पुढील तीन वर्षांत क्रमश: दारूबंदी लागू करावी, अशी मागणी बंग यांनी केली आहे. बंग म्हणाले, जयललिता यांनी दारुबंदीची सुरूवात केली. प्रथम बिहार, मग तामिळनाडू आता महाराष्ट्र कधी, हा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. तामिळनाडूत दारुचा वापर व राज्य शासनाला दारुपासून मिळणारा कर महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. दारुच्या करावर पाणी सोडणे प्रत्येक राज्य शासनाला आवश्यक आहे. बिहारने ते केले. तामिळनाडूनेही त्याची सुरुवात केली आहे. ‘महाराष्ट्र शासनाने या रक्त-लांछित कराचा लोभ सोडावा. लोकांना पाणी हवे, दारु नको. म्हणून आता राज्याचे दारु धोरण बदलवून पुढील तीन वर्षांत क्रमश: दारुबंदी लागू करावी, अशी मागणी बंग यांनी केली आहे. पहिल्या वर्षात, सर्व आत्महत्याग्रस्त जिल्हे, दुष्काळग्रस्त जिल्हे व आदिवासी तालुके यामध्ये पूर्ण दारुबंदी करावी. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी उर्वरित भागातील सर्व दुकाने बंद करावीत. पण दारुबंदी केवळ पहिले पाऊल आहे. सोबतच जनजागृती, लोकसहभाग, कायदेशीर अंमलबाजवणी व व्यसनमुक्तीचा उपचार, असा चार कलमी कार्यक्रम लागू करुन उत्तरोत्तर दारुमुक्तीकडे वाटचाल करावी. गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचा जिल्हाव्यापी प्रयोग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच सुरू होतो आहे. महाराष्ट्र गडचिरोलीपेक्षाही मागे राहणार का, असा सवाल त्यांनी केला.दर्द जब हद से गुजर जाता है...गालिब असे म्हणाला की, ‘दर्द जब हद से गुजर जाता है, खुद दवा बन जाता है’. दारुचा रोग फार वाढल्याने भारतात सर्वत्र जनता त्यावर उपाय शोधते आहे. ती गरज ओळखून राजकारणी प्रतिसाद देत आहेत. लोकशाहीत हे होणे अपेक्षितच आहे. महाराष्ट्राचा ‘मद्यराष्ट्र’ झाल्याने व येथील जनता चाळीस हजार कोटी रुपयांची वार्षिक दारु पीत असल्याने सरकारला या रोगावर उपाय शोधणे आवश्यक असल्याचे बंग यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)