शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

टँकर लॉबीमुळे दुष्काळ!

By admin | Published: April 19, 2016 4:32 AM

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच

मुंबई : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच दुष्काळ तीव्र केल्याचा आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे काम १५ दिवसांत पूर्ण केले, तेच काम तेथील राजकीय नेत्यांना एवढ्या वर्षांत का शक्य झाले नाही, असा सवाल करत खडसेंनी लातूरच्या तत्कालीन नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश केला. ते म्हणाले, लातूरपासून जवळच असणाऱ्या निम्म तेरणा धरणात पाणी आहे. ते पाणी तेथून लातूरला नेण्यासाठी बेलकुंड येथील फिल्ट्रेशन प्लॅन्ट चालू करणे आवश्यक होते. पण गेली अनेक वर्षे तो बंद पडून होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडून ही माहिती मिळताच आपण विशेष बाब म्हणून २ कोटी रुपये मंजूर केले. (विशेष प्रतिनिधी)लातूर महापालिकेच्या उपायुक्तांकडे बेलकुंडच्या फिल्ट्रेशन प्लॅन्टसाठी ब्लिचिंग पावडरची मागणी करण्यात आली होती; मात्र प्लॅन्ट लातूर महापालिकेच्या हद्दीत नाही, त्यामुळे आम्हाला पावडर देता येणार नाही, असे सांगून पावडर देण्यास उपायुक्तांनी नकार दिला होता, असेही खडसे यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक : २४ तासांच्या लाइनसाठी महावितरणला ३० लाख रुपये दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या १५ दिवसांत तो प्लॅण्ट चालू केला. आज तेरणातून ५० लाख लीटर व मिरजेहून जलदूत रेल्वेद्वारे ५० लाख लीटर पाणी सुरू झाले आहे. जळकोटजवळून तीन दिवसांनी एकदा १५ ते १६ लाख लीटर पाणी मिळेल अशी व्यवस्था लवकरच सुरू होत आहे, असेही खडसेंनी सांगितले.