शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली, मदत कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 09:11 IST

सिंधुदुर्गात ७० कोटी रुपयांचे नुकसान, सर्वत्र पंचनाम्याचे काम जोरात सुरू 

मनोज वारंग 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग : तौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा कोकणाला बसला आहे. त्यातही सिंधुदुर्ग आणि त्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली असून पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पाहणी दौरा करून मदतीपासून कुणीही वंचित राहणार नसल्याचे आश्वासन दिले असले तरी ‘निसर्ग’चा अनुभव पाहता मदत नेमकी कधी हातात पडणार याची धाकधूक नुकसानग्रस्तांना  असल्याचे चित्र दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचनामे करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून  ७० कोटींचे नुकसान झाले आहे. ६,६५२ घरे, ३३६ गोठे, ८७ शाळा, ४६ इमारती बाधित झाल्या आहेत तर ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १७२ गावांतील १,०५९ शेतकऱ्यांचे ३३७५.१६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परंतु प्रशासनाच्या अहवालानुसार ११ कोटी ९१ लाख ९८ हजार ४३० एवढे नुकसान झाले आहे. सर्व पंचनामे होण्यासाठी आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. 

पालघरमध्ये १ लाख ३० हजार नागरिकांना झळजिल्ह्यातील ९०९ गावांतील एक लाख ३० हजार नागरिकांना झळ लागली आहे. वादळात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. ५,२१७ घरांची पडझड झाली आहे. तर ७५ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २,२६४.२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेती आणि आंबा, काजू, केळी आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. ७२२ वृक्ष उन्मळून पडले असून, मच्छीमारांच्या १९ बोटी फुटल्या आहेत. ९०९ गावांतील १०९२ विद्युत पोल पडल्याने चार-पाच दिवस या गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला हाेता. सध्या पालघर विद्युत विभागाने त्यातील ८०० गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत केला असून, १०९ गावांतील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेतजून २०२० मध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील २९९ शेतकऱ्यांचे सुमारे ५ कोटी रुपयांवर नुकसान झाले होते. मात्र, आतापर्यंत केवळ २ कोटींपर्यंतच नुकसानभरपाई देण्यात आली आहे. निसर्ग वादळानंतर सलग दुसऱ्या वर्षी रायगड जिल्ह्यात १३ घरांचे पूर्णतः तर ११ हजार १४४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. १५० मासेमारी बाेटींसह १२५ मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे