शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

राज्यात टीबीचे १ लाख ३६ हजार रुग्ण

By admin | Published: September 19, 2015 3:33 AM

हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यात १ लाख ३६ हजार क्षयरोगाचे रुग्ण आहेत. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात

मुंबई : हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यात १ लाख ३६ हजार क्षयरोगाचे रुग्ण आहेत. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात अशा आजारांचा संसर्ग झपाट्याने होतो. क्षयरोगाची लागण रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. क्षयरोग रुग्णांचे निदान व्हावे, त्यांना उपचार मिळावेत यासाठी रोटरी क्लबने ‘टीबी भगाओ’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत ४ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील पहिले शिबिर १३ सप्टेंबर रोजी रोटरी फाउंडेशनच्या क्षयरोगतज्ज्ञ डॉ. डेनिस अड्डो यांच्या उपस्थितीत भरविण्यात आले होते. पुढच्या एका वर्षात एकूण ३ हजार १४० शिबिरांचे आयोजन मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, डहाणू, पालघर आणि नवी मुंबईमधील ११० रोटरी क्लबद्वारे करण्यात येणार आहे. क्षयरोगाच्या बरोबरीनेच फुफ्फुसाला होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी क्लबकडून ठोस उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये रुग्णांचे क्षयरोग निदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने एक्स-रे काढण्यात येईल. ज्यांना क्षयरोगाचा धोका असल्याचे निदान होईल त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात येईल. शिबिरांच्या बरोबरीने टीबीविषयक जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत. प्रमोद लेले आणि डॉ. श्रीपाद बोडस यांनी सांगितले की, मुंबईत फुफ्फुसाच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. एका शिंकण्यातून क्षयाचे ४० हजार जीवाणू बाहेर पडतात. याविषयी जनजागृती करून क्षयाला रोखण्यासाठी रोटरी क्लबने ही मोहीम सुरू केली आहे. (प्रतिनिधी)