शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

बाटलीबंद पाण्यातही ‘टीडीएस’ जास्तच!

By admin | Published: April 20, 2016 5:51 AM

शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड (टीडीएस) अर्थात, क्षारांचे प्रमाण

खामगाव (बुलडाणा) : शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड (टीडीएस) अर्थात, क्षारांचे प्रमाण हे ठरावीक पातळीपेक्षा जास्त असल्याचे ‘लोकमत’ने ११ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे.‘लोकमत’च्या चमूने खामगाव बसस्थानक परिसरातील हॉटेल्समध्ये पिण्यासाठी ठेवलेल्या थंड आणि तथाकथित शुद्ध पाण्याच्या जारमधील पाण्याचा टीडीएस तपासला असता, तो १२०च्या वर आढळून आला. एका समारंभात आणण्यात आलेल्या जारमधील पाण्याचा टीडीएसही ११५ आढळून आला. विशेष म्हणजे, काही ठिकाणी बाटलीबंद पाण्यामधील क्षारांचे प्रमाण जारमधील पाण्यापेक्षा जास्त होते. पाणी रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पाण्याची गुणवत्ता जमिनीच्या गुणधर्मावरही अवलंबून असते. प्रमाणापेक्षा जास्त फ्लोराईड, खारेपणा, लोहतत्त्व, आर्सेनिकयुक्त पाणी आरोग्यास अपायकारक असते. अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने बरेच आजार संभवतात. त्यामुळे नागरिकांचा कल आरओ (रिव्हर्स ओसमॉसिस) मिनरल वॉटरकडे वाढला आहे. हेच पाणी थंड करून हॉटेल्समध्ये जारमध्ये विकले जाते. बहुतांश हॉटेल्स, दुकाने, एवढेच काय, मध्यमवर्गीयांच्या घरीदेखील आरओ वॉटरचे जार आढळतात. ग्राहक वाढल्याने अनेकांनी थंड पाण्याचा हा व्यवसाय सुरू केला आहे. उन्हाळ्यात याची वाढती मागणी पाहता, अनेक व्यावसायिक पाणी शुद्ध न करता, फक्त थंड करून वितरित करतात. तहान लागल्यावर पाण्याची गुणवत्ता ही दुय्यम बाब ठरते. त्यामुळे या प्रकारांच्या कुणी फारशा खोलात जात नाही. प्रत्येकाजवळ टीडीएस तपासण्याची यंत्रणासुद्धा नसते. त्याचाच गैरफायदा घेत, व्यवसायिक तुंबड्या भरत असल्याचे पाहायला मिळत आहे.