शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

पंचनाम्याच्या कामातून शिक्षकांची सुटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2015 12:27 AM

एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे

मुंबई : एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत झालेल्या या निर्णयाने लाखो शिक्षकांना पंचनाम्याच्या कामातून मुक्ती मिळणार आहे.राज्याच्या गृह खात्याने १२ मे रोजी पंचनामा करताना लागणारा सरकारी कर्मचारी म्हणून शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश काढले होते. त्याचप्रमाणे पंचनाम्याच्या कामात सहभागी न होणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही त्या वेळी घेण्यात आला होता. मात्र जुने आदेश रद्द करताना पंचनाम्याचे काम नाकारलेल्या शिक्षकांवरील फौजदारी गुन्हेही मागे घेण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.बैठकीत पाटील यांच्यासोबत गृह विभागाचे मुख्य अधिकारी आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक परिषदेने शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी केली होती. परिषदेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच सरकारने जुने आदेश रद्द केल्याची प्रतिक्रिया परिषदेचे पदाधिकारी अनिल बोरनारे यांनी दिली.