शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

शिक्षकांचा पगार जिल्हा बँकेतून नको!

By admin | Published: June 12, 2017 2:40 AM

बृहन्मुंबईतील खासगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बृहन्मुंबईतील खासगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांमधून तीव्र निषेध केला जात आहे.यासंदर्भात शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत उशिरा होणाऱ्या वेतनामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. १० ते १२ दिवस उशिरा होणाऱ्या पगारांमुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांचे हफ्ते चुकल्याने कर्मचाऱ्यांना दंड भरावा लागत होता. जिल्हा बँकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिक्षक भारतीने मुंबईतील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत करण्यासाठी सतत ४ वर्षे पाठपुरावा केला होता. त्याचेच यश म्हणून ५ आॅक्टोबर २०११पासून मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार युनियन बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेतून होत होते. गेली सहा वर्षे युनियन बँक आॅफ इंडियाने शिक्षक, शिक्षकेतरांना सुरळीत व नियमित पगार दिले. शासनाकडून पैसे उशिराने आले, तरी बँकेमार्फत पगार कधीही उशिरा झाले नाहीत. अगदी एप्रिल महिन्यातही बँकेने वेळेत पगार देण्याची भूमिका पार पाडली. तरीही राज्यभर जिल्हा बँका अडचणीत येत असताना, केवळ मुंबई जिल्हा सहकारी बँकेला संजीवनी देण्यासाठी मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचा बळी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेनेही या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. शिवाय मुख्यमंत्री, वित्तमंत्री व शिक्षणमंत्री यांनी संबंधित निर्णय बदलण्याची मागणी संघटनेने केली आहे. जिल्हा बँकेला नवसंजीवनी द्यायची असेल, तर ग्रामसेवकापासून ते मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांचे पगार व मानधन हे जिल्हा बँकेतून द्यावेत, असा खोचक टोलाही संघटनेने लगावला आहे. पूर्वीचा शासन निर्णय बदलण्यामागे नेमके काय कारण होते? याची समर्पक उत्तरे मंत्रालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे नसल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.