शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

शिक्षकांनी परत पाठविले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे; दहावी, बारावीच्या निकालावर परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 8:46 AM

शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार दिल्याने अनेक गठ्ठे टपाल कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. 

मुंबई : विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. राज्य मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या उत्तरपत्रिका राज्यातील २५ हजार शिक्षकांनी परत पाठविल्या आहेत. शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार दिल्याने अनेक गठ्ठे टपाल कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे दहावी, बारावीचा निकाल विलंबाने लागण्याची शक्यता आहे. राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. ज्या विषयाच्या परीक्षा झाल्या, त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांकडे पाठविण्यात येत आहेत. आपल्या मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेल्या विनाअनुदानित शिक्षकांनाही उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. मात्र राज्यातील २५ हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार देत परत पाठविले. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे अनेक गठ्ठे हे बोर्डात, टपाल कार्यालयात पडून आहेत. मुंबईतील दीड ते दोन हजार शिक्षक, कोल्हापूरमधील दोन हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठविले असून, अन्य जिल्ह्यांमधूनही शिक्षक उत्तरपत्रिकांचे गठ्ठे परत पाठवीत आहेत.अनेक वर्षांपासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर राज्यातील लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी आगाऊ सूचना महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षण विभागाचे सचिव, राज्य मंडळ यांना निवेदनाद्वारे दिली होती. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने अखेर कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील २५ हजार शिक्षकांनी उत्तरपत्रिकांचे गठ्ठे घेण्यास नकार देत परत पाठविले आहेत. कायम विनाअनुदानित शाळांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. निकाल उशिरा लागल्यास त्यासाठी सरकारच जबाबदार असेल.- संजय डावरे, अध्यक्ष,  विनाअनुदानित कृती समिती, मुंबई