शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

संविधानाचे भगवेकरण करण्याचा संघाचा प्रयत्न

By admin | Published: April 03, 2016 3:51 AM

आपल्या संविधानात तिरंगा राष्ट्रध्वज आणि जन गण मन या दोन्हींना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी

ठाणे : आपल्या संविधानात तिरंगा राष्ट्रध्वज आणि जन गण मन या दोन्हींना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी भगवा ध्वज आणि जन गण मन या राष्ट्रगीताऐवजी वंदे मातरम् हे गीत आणून संविधानाचे भगवेकरण ते करू पाहत आहेत. त्यांचे हे कृत्य संविधानविरोधी असल्याने त्यांना देशद्रोही ठरवावे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यावर आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. जन गण मन या राष्ट्रगीताऐवजी वंदे मारतम् हे नवे राष्ट्रगीत बनवावे तसेच भगव्या झेंड्याला राष्ट्रध्वज मानावे, अशी वादग्रस्त मागणी केली आहे. त्यांच्या या विधानाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मागणी देशविरोधी आहे. संविधानाने तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. तसेच जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणून सामावून घेतले. या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाहीत. त्यांनी कधी देशाचा ध्वज सन्मानाने फडकवला नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी सहभाग घेतला नाही. ते आज देशभक्ती शिकवत आहेत. त्यांना हा देश भगवा करायचा आहे, अशी वादग्रस्त वक्तव्ये करून या देशात विषाचे वातावरण पसरवायचे आहे. दुर्दैवाने अशा फुटीरतावादी विचारांवर चालणाऱ्यांची सत्ता या देशात आल्याची टीका त्यांनी केली. संघाची अशी वक्तव्ये संविधानविरोधी आहे. त्यामुळे जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तशी हिंमत या सरकारमध्ये आहे का,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)