शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

तंत्रज्ञानामुळे पुढच्या ३० वर्षांत होणार उद्योगक्रांती

By admin | Published: January 17, 2017 6:14 AM

तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे भौतिक, डिजिटल आणि जैविकमधील रेषा धूसर होत चालल्या आहेत.

मुंबई : तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे भौतिक, डिजिटल आणि जैविकमधील रेषा धूसर होत चालल्या आहेत. आता एक नवे जग आकार घेत आहे. यापूर्वी कधीही न आलेला अनुभव तंत्रज्ञानामुळे सर्वांना अनुभवता येत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उद्योग-व्यवसायातील अनेक अडथळे सहजरीत्या दूर होत आहेत. गेल्या १० वर्षांत ज्या व्यवसाय-उद्योगांना भरारी घेता येत नव्हती, असे उद्योग आता आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करू लागले आहेत. त्यामुळेच गेल्या ३०० वर्षांत मानवाने जितके साध्य केले, त्यापेक्षा अधिक पुढच्या ३० वर्षांत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य करू शकणार असल्याचे प्रतिपादन उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केले. मुंबई विद्यापीठाचा १६०व्या दीक्षांत पदवी समारंभ सोमवारी पार पडला. या समारंभाला राज्यपाल विद्यासागर राव, कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुकेश अंबानी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी स्नातकांना मार्गदर्शन केले. यंदाच्या समारंभात ३६ विद्यार्थिनींना सुवर्ण पदके, ५८ स्नातकांना पदके प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर, दोन कुलपती पारितोषिके आणि एक कुलपती पदकही बहाल करण्यात आले. अंबानी पुढे म्हणाले, ‘सध्याची तरुण पिढी एका वेगळ््या विश्वात जगत आहे. आयुष्य ही स्पर्धा नसून प्रवास आहे. ही पिढी वचनबद्ध, आशावादी आणि आदर्शवादी आहे. त्यामुळे स्पर्धा करताना स्वत:शीच स्पर्धा करा. चांगले व्यक्तिमत्त्व आणि वर्तणूक हे महत्त्वाचे गुण आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा.’ पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश आता आॅनलाइन पद्धतीने होणार असून, शुल्कदेखील आॅनलाइन घेतले जाणार असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले. ते म्हणाले, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत कलिना कॅम्पस आणि ठाण्यातील कॅम्पस आॅडिटोरिअम डिजिटल करण्यात येणार आहेत आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांत ४० व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)>डिजिटल लॉकर मुंबई विद्यापीठातून यंदा पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा डिजिटल लॉकर तयार करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व सटिर्फिकेट्स त्यांना उपलब्ध होणार आहेत. मुकेश अंबानींचा पहिला डिजिटल लॉकर तयार करण्यात आला. या डिजिटल लॉकरमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी त्यांची सर्टिफिकेट मिळणार आहेत.