शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

५ जूनला तहसीलदार कार्यालय बंद करणार!

By admin | Published: June 03, 2017 3:43 AM

शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. या आंदोलनात किसान सभेसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीटू ही कामगार संघटना खांद्याला खांदा लावून उभे असतील, अशी माहिती माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सीताराम येचुरी यांनी दिली. ते मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.येचुरी म्हणाले की, शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी २ दिवस नाशिक ठप्प केले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ६ महिन्यांचा वेळ मागत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, तब्बल एक वर्ष उलटल्यानंतरही शेतमालाला हमीभाव नाही. उत्पादनाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते, त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. फक्त सांप्रदायिक मुद्दे पुढे करून, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सद्यस्थितीत देशात दरवर्षी १.५ कोटी सुशिक्षित तरुण महाविद्यालयांतून बाहेर पडत असून, केवळ १.३ लाख रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकार कानाडोळा करत असल्यानेच, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे म्हणाले की, ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी तहसीलदार कार्यालयाचा ताबा घेतील. शेतकरी संपामुळे शहरी भागातील मध्यमवर्गीयांची परवड होत असली, तरी त्याग केल्याशिवाय क्रांती होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनी त्याग करण्यास तयार राहावे. बड्या उद्योगपतींची कर्जे माफ होतात. मग शेतकऱ्यांवरच अन्याय का?’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.