शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'त्याला सांग मी मागेच आहे'; अबू आझमी, रईस शेख पत्रकारांशी बोलत होते, तितक्यात नितेश राणे....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:29 IST

विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधीवेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबु आझमी भिडले होते. यानंतर सभागृहाबाहेरही तूतू मैमै झाली...

गेल्या काही काळापासून कणकवली-देवगडचे आमदार नितेश राणे हिंदुत्ववादी भुमिकेत आले आहेत. त्याचे पडसाद ठिकठिकाणी त्यांच्या वक्तव्यांतून उमटताना दिसत आहेत. आज विधासभेत सभागृहात आणि सभागृहाबाहेर पत्रकारांसमोर नितेश राणे यांचा आक्रमकपणा दिसून आला आहे. 

विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधीवेळी भाजपा आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबु आझमी भिडले होते. औरंगजेबाचा फोटो लावून काहीजण महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायेत. वंदे मातरम म्हणणार नाही असं बोलतात. औरंग्या तुमचा बाप आहे अशा घोषणा दिल्या जातात. हे शिवरायांच्या महाराष्ट्रात चालणार नाही. ज्यांना या घोषणा द्यायच्या आहेत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणेंनी खडेबोल सुनावले. हे सांगत असताना राणे अबू आझमींकडे इशारे देत होते. 

असे काही लोक आहेत जे वंदे मातरम म्हणत नाही. पण मिरवणूक काढली जाते तेव्हा सर तन से जुदा अशाप्रकारे घोषणा देतात. हे लोक गद्दार आहेत. सगळे मुद्दाम घडवले जातेय. औरंग्या तुम्हारा बाप आहे अशा गोष्टी राज्यात चालल्या आहेत. या लोकांनी पाकिस्तानात निघून जावे, अशी टीका नितेश राणे यांनी केली होती. 

यावर सपाचे आमदर अबू आझमी आणि रईस शेख हे सभागृहाबाहेर पत्रकार परिषद घेत होते. यावेळी रईस शेख यांनी नितेश राणेंनवर टीका केली. गेल्यावेळीही राणेंनी मला गद्दार म्हटलेले. आताही त्यांनी गद्दार म्हटलेय. ही त्यांनी मानसिकता आहे. त्यांच्या डोक्यात हे भरलेले आहे. या मानसिकतेविरोधात लढण्याची गरज आहे, असे शेख म्हणाले. 

यावेळी नितेश राणे त्यांच्या मागेच उभे होते. रईस शेख बोलत असताना नितेश राणे यांनी 'त्याला सांग मागे उभा आहे' म्हणून, असे म्हटले. यावर शेख आणि आझमी यांनी मागे वळून पाहिले. तसेच तुम्ही हे बोलला की नाही हे सांगावे असे शेख म्हणाले. 

आम्ही अध्यक्षांना सांगणार आहोत पत्र देणार आहोत की नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी. त्यांनी लक्षवेधी लावली आणि आम्ही बोलण्याची मागणी केली परंतु आम्हाला बोलू दिले नाही.  आम्हाचे औरंगजेबाच्या बाबतीत काही म्हणणं नाही. परंतु आम्ही बोलण्याची मागणी केली तेव्हा त्यांनी आमच्याकडे बोट दाखवलं आणि हे गद्दार आहेत असं सांगितले. नितेश राणेंनी आमची माफी मागावी ही आमची मागणी आहे. पत्र द्यायची ही गरज नाही ते पटलावर आहेत आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणीच असेल, असे शेख म्हणाले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Abu Azmiअबू आझमीBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा