शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
2
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
4
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
5
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
6
शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय
7
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
8
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
9
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
10
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
11
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
12
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
13
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
14
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
15
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
16
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
17
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
18
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती
19
‘काैटुंबिक हिंसाचार कायदा सर्व धर्मांतील महिलांना लागू’
20
मधुमेह, जीवनसत्त्वे, रक्तदाबावरील गोळ्यांसह ५३ औषधे ठरली निकृष्ट दर्जाची

दहशतवादी सलिक होता नागपूर ‘एटीएस’ ला वॉन्टेड!

By admin | Published: November 01, 2016 2:42 AM

औरंगाबाद येथे २०१२ ला झालेल्या चकमकीत अकिल खिलजी जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला

नरेश डोंगरे,

नागपूर- भोपाळनजीक पोलिसांनी सोमवारी पहाटे कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांपैकी तिघांचे महाराष्ट्रात खास करून विदर्भ-मराठवाड्यातील नागपूर, सोलापूर आणि औरंगाबादमध्ये जबरदस्त नेटवर्क होते. औरंगाबाद येथे २०१२ ला झालेल्या चकमकीत अकिल खिलजी जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला होता. तर, या चकमकीनंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेला मोहम्मद सलिख हा दहशतवादी नागपूर-औरंगाबाद एटीएसला ‘वॉन्टेड’ होता. गेल्या चार वर्षांपासून सलिखचा ताबा मिळावा म्हणून राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रयत्नरत होते. भोपाळ जेल ब्रेक आणि एन्काऊंटरनंतर ही खळबळजनक बाब उजेडात आली आहे. भोपाळमध्ये जेल ब्रेक झाल्याचे वृत्त सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास स्थानिक सुरक्षा यंत्रणांना कळले. त्यानंतर मोहम्मद खालिद अहमद, शेख मुजीब, मजीद, अकील खिलजी, जाकीर, महबूब, अमजद आणि सलिख या दहशतवाद्यांच्या शोधार्थ एटीएस आणि पोलीस रेल्वेस्थानक तसेच नागपूर शहराला जोडणाऱ्या मध्य प्रदेशच्या सर्व मार्गावर शोधकार्य राबवू लागले. काही वेळेनंतर या सर्व दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाल्याचे कळाल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे पुढे येताच सुरक्षा यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली. कारण या आठ दहशतवाद्यांपैकी तिघे प्रत्यक्ष महाराष्ट्रातील घातपाती कृत्य तसेच घातपाताच्या कटकारस्थानाशी जुळलेले होते. दहशतवादी मोहम्मद खालिद अहमद हा मूळचा सोलापूरचा निवासी होय. एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, तो प्रारंभी सिमीत सक्रिय होता. सफदर नागोरी आणि रियाज भटकळच्या संपर्कात आल्यानंतर खालिद खतरनाक दहशतवादी बनला. तो नंतर इंडियन मुझाहिदीनमध्ये (इंमू , सिमीची पुढची आवृत्ती) काम करू लागला. तपास यंत्रणांच्या नजरेत येताच तो महाराष्ट्रातून एकाएक गायब झाला. त्यावेळी सिमीवर बंदी येण्यापूर्वी राज्याचा महासचिव म्हणून काम करणारा जियाउद्दीन सिद्दीकी (औरंगाबाद) याच्या संपर्कात खालिद आला.त्यानंतर सिमीचे राज्यभरात जोरदार नेटवर्क तयार झाले. औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात त्यांनी सिमीच्या स्लीपरची भलीमोठी फळी तयार केली. घातपाती कृत्य करण्यासोबतच सिमी-इंमूचे दहशतवादी स्लिपर्सच्या माध्यमातून बँका लुटून, दरोडे घालून फंड जमा करीत होते. >चिखलीतही कटकारस्थानऔरंगाबाद चकमकीनंतर तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळ झोकून पळून गेलेला मोहम्मद सलिख याचा शोध घेण्यासाठी एटीएस जंगजंग पछाडत होती. दरम्यान, औरंगाबाद चकमक आणि तत्पूर्वी चिखली (जि. बुलडाणा) जवळ त्याने कटकारस्थान केल्याचे तपासात पुढे आले होते. त्यामुळे त्याच्याकडून राज्यातील सिमीच्या नेटवर्कचा धक्कादायक खुलासा होऊ शकतो, अशी खात्री एटीएसला होती. त्याला खंडवा जेल ब्रेक प्रकरणात अटक झाल्याचे माहीत झाल्यानंतर नागपूर-औरंगाबाद एटीएसने मध्य प्रदेशच्या सुरक्षा यंत्रणांकडे त्याचा ताबा मिळावा म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र, खंडवा प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला मध्य प्रदेशातून बाहेर काढण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यामुळे त्याचा ताबा स्थानिक एटीएसला मिळू शकला नाही. आज भोपाळच्या जेल ब्रेक आणि एन्काऊंटरमध्ये खालिद, खिलजीसोबत सलिखचेही नाव आल्याने तपास यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.