शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

गणितासह भाषेची कसोटी

By admin | Published: July 05, 2016 1:29 AM

विद्यार्थ्यांची ‘गणित’ आणि ‘भाषा’ या विषयांच्या अभ्यासाची कसोटी लागणार आहे. कारण २४ ते ३० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीला सामोरे जावे लागणार

मुंबई : विद्यार्थ्यांची ‘गणित’ आणि ‘भाषा’ या विषयांच्या अभ्यासाची कसोटी लागणार आहे. कारण २४ ते ३० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ही पायाभूत चाचणी घेण्यात येणार असून, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी असणार आहे.विद्यार्थ्यांचे ‘गणित’ आणि ‘भाषा’ हे विषय कितपत पक्के आहेत? याचा आढावा याद्वारे लेखी स्वरूपात घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील खासगी, अनुदानित, विना-अनुदानित, अल्पसंख्याक शाळांना पायाभूत चाचणी घेणे बंधनकारक राहणार आहे. यंदा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे राज्यभरातील शाळांना प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार असून, शाळेने २४ ते ३० जुलै या कालावधीत ही चाचणी घेणे अनिवार्य असणार आहे. गणित आणि भाषा विषयांवर आधारित ही चाचणी आहे. विद्यार्थ्यांना या विषयातील कितपत ज्ञान आहे, हे पाहण्यासाठी चाचणी घेतली जाते. या चाचणीतून विद्यार्थ्यांचा त्या विषयातील अभ्यास कितपत आहे ते कळते. (प्रतिनिधी)इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत अशी भीती पालकांना होती. या पायाभूत चाचणीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची एक प्रकारे उजळणीच होणार आहे.- विद्या चव्हाण, पालकपायाभूत चाचणी परीक्षेचा फायदाच झाला आहे. मुलांना गणित आणि भाषा विषयाचे ज्ञान आहे की नाही? हे शिक्षकांसोबत पालकांनासुद्धा कळते. या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना विशेष अभ्यास करावा लागत नाही, अगदी साध्या-सोप्या आणि झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असते. याचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो.- स्मिता बटा, पालकगेल्या वर्षी सहावीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येची बेरीज; असे प्रश्न विचारण्यात आले होते. सहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेप्रमाणे प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. तरच या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. शिवाय पायाभूत चाचणीत ‘ड’ श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काही विशेष तरतुदी कराव्यात.- अनिता विचारे, शिक्षिका, पराग विद्यालय