शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारची कसोटी; विरोधकांचा आत्मविश्वास वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 09:46 IST

विजयामुळे आत्मविश्वास वाढलेले विरोधक आक्रमक होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवार, २७ जुलैपासून सुरू होत असून, विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने ते वादळी ठरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे मनोबल वाढलेली महाविकास आघाडी अधिवेशनात आक्रमक असेल. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन उपमुख्यमंत्र्यांची कसोटी लागणार आहे.

मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात उभा राहिला आहे. त्यावर सरकार अधिवेशनात काय तोडगा काढणार, याबाबत उत्सुकता असेल. मराठा आरक्षणाचा मोठा फटका सत्तारूढ महायुतीला राज्यात बसल्याचे चित्र समोर आले होते. त्यातच आता ओबीसी समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाला असताना या विषयाचे पडसाद अधिवेशनात उमटतील हे स्पष्ट आहे.

शेवटचेच अधिवेशन

  • अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवावयाच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. या निकालाचे पडसादही अधिवेशनात उमटतील.
  • अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १२ जुलैला विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
  • त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २५ जूनपासून सुरुवात होणार असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने विधीमंडळ अधिवेशनातही राजकारण जोरात असेल. अधिवेशनानंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागतील.

अर्थसंकल्प सादर होणार

  • कापूस, सोयाबीन पिकाला न मिळालेला भाव, कांदा प्रश्न, सरकारने निर्णय घेतले पण त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, असे मुद्देही विरोधकांची आयुधे असतील आणि त्या आधारे सत्तापक्षाची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मार्चमध्ये झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने वित्तमंत्री अजित पवार यांना पूर्ण अर्थसंकल्प मांडता आलेला नव्हता, त्यांनी केवळ लेखानुदान सादर केले होते.
  • आगामी अधिवेशनात ते अर्थसंकल्प सादर करतील. विधानसभा निवडणूक साडेचार महिन्यांवर असताना या अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजनांचा वर्षाव असेल, असे मानले जात आहे. त्याचवेळी महायुती सरकारचे काही घोटाळे अधिवेशनात बाहेर काढण्याची तयारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करीत आहेत.

मंत्रिमंडळ विस्ताराला अनुमती नाही सूत्रांनी सांगितले की, अधिवेशनापूर्वी राज्य अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षनेतृत्वाकडे तशी मागणी केली असली तरी अद्याप त्यासाठीची अनुमती मिळू शकलेली नाही. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित करतील. मात्र, सत्तारूढ आणि विरोधी पक्षांदरम्यान ताणले गेलेले संबंध, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आलेली कटुता आणि काँग्रेसने महायुती सरकारवर नव्याने सुरू केलेले आरोप या पार्श्वभूमीवर विरोधक या चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती