शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राज्यातील ठाकरे सरकार येत्या मे-जून महिन्यात कोसळणार?; भाजपा नेत्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 12:05 IST

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

नागपूर - राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली आहे तर सर्वाधिक जागा मिळूनही राज्यात भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. मात्र कर्नाटकमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने बाजी मारली. त्याचे पडसाद राज्यातही उमटताना दिसत आहे. 

भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार गिरीश व्यास यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दावा केला आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे-जून महिन्यापर्यंत कोसळेल. इतकचं नाही तर भाजपाने निवडणुकीची तयारीदेखील केली आहे. त्या निवडणुकीत भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

कर्नाटक पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. काँग्रेस आता लोकांची विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठित खजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देते. जनतेने भाजपाला नवी ताकद दिली आहे अशा शब्दात नरेंद्र मोदींनी कर्नाटक विजयावर भाष्य केलं होतं. 

तर जनतेने नाकारलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येतात,जनादेशाचा अपमान करून संधीसाधू राजकारण करतात,त्यानंतर पहिली संधी मिळताच जनता त्यांना कसा धडा शिकविते,याचे उदाहरण कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले आहे.जनादेश व जनतेच्या इच्छेविरोधात जाण्याचे परिणाम कर्नाटक निकालांनी दाखवून दिले आहेत असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे. 

याचदरम्यान, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर अजित पवारांनी हवापाण्याच्या गप्पा झाल्या असं स्पष्टीकरण केले असले तरी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आशावादी असल्याचं दाखवून दिलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा जन्मच मुळात कामाच्या आधारावर किंवा विकासाच्या नावावर झालेला नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचा जन्म सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपायी झाला आहे. महाराष्ट्र आघाडीचा जन्म जनादेशाचा अवमान करत, महाराष्ट्राचा अपमान करत झालेला आहे. तसेच लवकरच गोड बातमी महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे. कोणत्याही दिवशी, कोणत्याही महिन्यात ती येऊ शकते असं सांगत सस्पेन्स कायम ठेवला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Vyasगिरीश व्यासSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv Senaशिवसेना