शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

मराठा समाजाला दिलासा, ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 10:11 IST

अन्य प्रवर्गांच्या आरक्षणाला धक्का नाही

मुंबई : राज्य सरकारी नोकऱ्यांमधील नियुक्ती आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) असलेल्या १० टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजालाही देण्याचा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला.  सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे (एसईबीसी) आरक्षण रद्दबातल ठरविल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. संसदेने संविधानात १०३ व्या घटनादुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने आजचा निर्णय घेतला. मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्ग तयार करून शिक्षण व नोकऱ्यांमध्ये अनुक्रमे १२ व १३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र, हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. आता आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीचे (ईडब्ल्यूएस) आरक्षण मराठा समाजालाही देण्यात आले आहे. आधीच्या भरतीचे काय होणार?९ सप्टेंबर २०२० पूर्वी ज्या निवड प्रक्रियांचा अंतिम निकाल लागलेला आहे, परंतु उमेदवारांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत, अशा प्रकरणी सदर आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. याचा अर्थ अशा उमेदवारांनाही ईडब्ल्यूएस आरक्षण लागू राहील. मात्र, याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले की, पूर्वलक्षी प्रभाव लागू करताना अडचण अशी आहे की, अनेक जाहिरातींमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण लागूच नव्हते. त्यामुळे एसईबीसीतून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसमध्ये कसे सामावून घेणार?मराठा आरक्षण लागू असताना नोकऱ्यांमध्ये त्यांना १३ टक्के आरक्षण होते. आता ईडब्ल्यूएसमध्ये १० टक्के आरक्षण आहे. ते सर्वच्या सर्व मराठा उमेदवारांना मिळाले (ज्याची शक्यता नाहीच)  तरीही तीन टक्के उमेदवार वंचित राहणार आहेत. ईडब्ल्यूएसच्या प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर आजच्या जीआरने मिळत नाही. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी त्यावर, सर्वच सर्व जागा विशेष बाब पद्धत किंवा सुपर न्यूमरिक पद्धतीने भराव्यात, असा पर्याय सुचविला.मराठा समाजासाठीच्या आरक्षणासाठी कोणते पर्याय आपण देऊ शकतो, हे शासनाने स्पष्ट करावे. आरक्षण नसलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गांना ईडब्ल्यू  एसचे आरक्षण कायद्यानेच दिलेले आहे. ते नाकारण्याचा अधिकार राज्याला नाही. एसईबीसी प्रवर्गात मराठा समाजाला १३ व १२ टक्के आरक्षण होते. शिवाय, वयोमर्यादेचाही फायदा होता. ईडब्ल्यू  एसचे १० टक्के आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील सर्वच जातींना लागू असते. मराठा समाजाला वेगळे असे आरक्षण दिलेले नाही.      - विनोद पाटील, याचिकाकर्ते, औरंगाबाद.असे असतील पात्रतेचे निकष...एसईबीसी प्रवर्ग म्हणून मराठा समाजाला आधी देण्यात आलेले आरक्षणाचे लाभ आजच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहेत. मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसप्रमाणे उत्पन्नाची अट (वार्षिक ८ लाख रुपये) व पात्रतेचे अन्य निकष लागू राहतील.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण