शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 11:36 AM

Sanjay Raut News: काँग्रेसचा बेस आहे, हे मान्य करावे लागेल. २०२४ च्या भूकंपात भाजपा वाहून जाणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: २०२४ ला देशात आणि राज्यात परिवर्तन होईल. मात्र, ईव्हीएम विषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहे, हेच उद्या ईव्हीएम बाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही. आपण विष्णूचे १३ वे अवतार आहेत मग बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरता? कारण अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला ३३ कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाहीत. भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमवरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएम माध्यमातून हुकूमशाही सुरु आहे. इतका महान शक्तिमान नेता का घाबरतो, जगात कुठेही ईव्हीएम निवडणूक आता होत नाही. देशात १९ लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या आहेत, त्या कुठे आहेत यातून संशय बळावतो. मध्य प्रदेश निवडणुकात पोस्टल बेलेटमध्ये काँग्रेस आघाडी वर होते, ईव्हीएम सुरू झाले आणि काँग्रेस मागे पडले, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात आहेत. आम्ही २५ वर्ष भाजपच्या प्रेमात होतो. आमचा प्रेमभंग झाला आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती

मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती घेतली. कोण कुठे लढेल यावर एकमत झाले आहे. २०१९ ला संभाजीनगर लोकसभा जो अपघात झाला त्याची दुरुस्ती करायची आहे. एनसीपीसोबत जागा वाटप निश्चित झाले आहे, वंचितसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. यावेळी कुणीही भाजपला मागच्या दाराने मदत करणार नाही, पोटात एक ओठात एक असे कुणीही करणार नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीने शिवसेनेला प्रकाश आंबेडकर सोबत चर्चा करण्याची मुभा दिली आहे. जागावाटप फॉर्म्युला तिन्ही पक्षांचे प्रमुख जाहीर करतील. वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे, जागा संदर्भात लहान सहन गोष्टी आहेत. या वातावरणात प्रकाश आंबेडकर नवीन आहेत मात्र देशाचे नेते आहेत, आमच्या या आघाडीत ते नवे आहेत. काँग्रेस आमच्या आघाडीतील मोठा पक्ष आहे, असे संजय राऊतांनी सांगितले. 

पंतप्रधानांना रोड शो करण्यापलीकडे काम नाही

पंतप्रधानांना रोड शो करण्यापलीकडे काम नाही, नाशिकला येतायत आनंद आहे, मात्र मणिपूर ला का जात नाही? काश्मीरमध्ये पंडितांच्या छावण्या मध्ये जात नाहीत. महायुतीकडे आम्ही लक्ष देत नाही त्या मेलेल्या कोंबड्या आहेत. आमदार मारहाण लोकांनी पहिली आहे, गृहमंत्र्यांनी पाहिले आहे कारवाई कोण करणार, अशी विचारणा संजय राऊतांनी केली. तसेच हा महाराष्ट्र आहे जपान नाही भूकंप व्हायला. २०२४ च्या भूकंपात तुम्ही वाहून जाणार. ईडी चा वापर करून भूकंप करणे याला भूकंप म्हणत नाही, डरपोकपणा म्हणतात, या शब्दांत संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, काँग्रेससोबत बोलणी योग्य मार्गाने सुरु आहे. ४ दिवसात आम्ही दिल्लीत जाऊन काँग्रेससोबत अंतिम चर्चा करणार आहोत. मसुदा ठरवू, मात्र जागा वाटपात कुठलीही अडचण नाही. काँग्रेसकडून जागावाटपाबाबत काही जाहीर वक्तव्य आले नाही. कुणी वरिष्ठ बोलले नाहीत. जो जिंकेल त्याची जागा असे आम्ही ठरवले आहे. आकडे वाढवायला कुणालाही जागा मिळणार नाही. काँग्रेसने कुठल्याही जास्त जागा मागितल्या नाहीत. राज्यात काँग्रेसचा बेस आहे हे मान्य करावे लागेल. देशात ३०० ठिकाणी काँग्रेस भाजप थेट लढत आहे त्या जागा २०२४ भविष्य ठरवेल, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEVM Machineएव्हीएम मशीनBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी