शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

देशात सर्वोच्च सोहळा होणार, त्यात राष्ट्रपतींना डावलणार?; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:55 AM

देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय आहे. राहुल गांधी यांच्या मुद्द्यांशी मी सहमत आहे असं राऊत म्हणाले.

मुंबई - संसद भवनाचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हायला पाहिजे. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष नंतर येतात प्रत्येक गोष्टीत निवडणुकीसाठी राजकारण करायचं फक्त आम्ही आणि आम्हीच मी आणि मीच हा मीपणाचा कहर आहे. नव्या संसदेच्या उद्धाटनाला राष्ट्रपती नसतील तर ही गंभीर बाब नसून हास्यास्पद आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय आहे. राहुल गांधी यांच्या मुद्द्यांशी मी सहमत आहे. सेंट्रल व्हिस्टाची अजिबात गरजच नव्हती. आपल्या संसदेपेक्षा जुन्या इमारती इटली आणि इतर ठिकाणी आहेत. राजकीय हव्यासा पोटी आणि हा इतिहास आम्ही घडवला, मी दिल्ली नवीन घडवली त्यासाठी लाखो रुपये आणि जनतेच्या पैशाचा चिरोडा करून आणि राष्ट्रपतींना डावललं जातंय त्याचे उद्धाटन होत आहे. हा या सर्वोच्च पदाचा अपमान आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत गेल्या ९ वर्षात अशा व्यक्तीला बसवलं गेलंय, जी काहीच बोलणार नाही. कोणीही जाब विचारले जाणार नाही असे दोन कालखंडामध्ये राष्टपती बसवले गेले. सोहळ्याला विरोधकांनी बहिष्कार करायचा ठरवला तर आम्ही त्या मध्ये सहभागी होऊ. संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. देशातला सर्वोच्च सोहळा होणार आहे त्यात राष्ट्रपतींना डावलणार? निवडणुका आल्या की आदिवासींचा मुद्दा पुढे करणार. भाजपा २४ तास ३६५ दिवस केवळ राजकारण आणि निवडणुकांचा विचार करतं. हा निवडणुकांनी ग्रासलेला पक्ष असून देशातील समस्यांशी यांचं काही देणघेण नाही अशी टीकाही राऊतांनी भाजपावर केली. 

मविआ नेते जयंत पाटलांच्या पाठिशीआमच्या सोबत नाही आलात तर ईडीचा त्रास देऊ. जयंत पाटलांच्या बाबतीतही तेच होतंय. महाविकास आघाडी जयंत पाटलांच्या पाठीशी आहे. आम्ही अन्यायाविरोधात लढू. या देशात लोकशाही आहे कुठे केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होत आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे काही लोक आहे ते तुमच्या पुढे झुकणार नाही. प्रत्येक घटक पक्ष हा जयंत पाटील यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे असंही राऊतांनी म्हटलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी