शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

शरद पवारांची भूमिका वेगळी असू शकते, पण...; संजय राऊत स्पष्ट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 10:50 AM

उद्योगपतींशिवाय देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होणार नाही. देशाच्या गतीला चालना मिळणार नाही. पण याचा अर्थ देशात १-२ उद्योगपती राहतील असे नाही असं सांगत राऊतांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला

मुंबई - शरद पवारांनी जी भूमिका मांडली ती पहिल्यापासून आहे. त्यात नवीन काही नाही. संसदेचे अधिवेशनही चालले नाही. केवळ अदानी मुद्दा नव्हता तर महागाई, बेरोजगारीसारखे अनेक विषय होते. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाची भूमिका स्वतंत्र होती. परंतु ते दोन्ही पक्ष विरोधकांच्या आघाडीत तेव्हाही होते आणि आजही आहेत असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांनीअदानींसंदर्भात वेगळी भूमिका मांडली असली तरी त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतीही फूट अथवा तडा जाणार नाही. अदानींना शरद पवारांनी क्लीनचीट दिली नाही. चौकशीचे पर्याय आहेत त्याबाबत मत व्यक्त केले. आम्ही सर्व जेपीसी चौकशीचा आग्रह धरतो. पण जेपीसीत चेअरमन, सदस्य सत्ताधारी पक्षाचे असतात. त्यातून निष्पन्न काय होणार? त्यांना हवा तो रिपोर्ट देऊ शकतात. त्यामुळे विशिष्ट कालमर्यादेत न्यायालयीन चौकशी हा पर्याय पवारांनी सूचवला. अदानींबाबत वेगळे मत असू शकते. विरोधी पक्षातील एकजुटेला धक्का लागणार नाही असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत देशातील गुन्हेगाराला ज्या मार्गाने शिक्षा मिळेल असे कुठलेही पर्याय चालू शकतात. परंतु विरोधी पक्ष अदानींबाबत जेपीसी चौकशीवर ठाम आहे. शरद पवार ज्येष्ठ नेते हे त्यांचे मत आहे. हिंडेनबर्ग अहवालाने देशात आणि जगात खळबळ माजली. भाजपाने देशातील जनतेचा पैसा उद्योगपतीच्या खिशात घातला हे समोर आले. संपूर्ण सत्ता एका उद्योगपतीच्या पाठिशी राहिले. अंबानी किंवा अन्य कुणीही असो उद्योग टिकायले हवेत. उद्योगपतींशिवाय देशाची आर्थिक व्यवस्था मजबूत होणार नाही. देशाच्या गतीला चालना मिळणार नाही. पण याचा अर्थ देशात १-२ उद्योगपती राहतील असे नाही असं सांगत राऊतांनी सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. 

काय म्हणाले होते शरद पवार?“कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होणं आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यानं संपूर्ण प्रक्रियेचं नुकसान होतं. हिंडेनबर्ग अहवालाला विरोधकांकडून गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं गेलं. याची पार्श्वभूमी कोणालाही माहित नाही, ना आम्ही त्याचं नाव ऐकलंय, या प्रकरणी एका व्यावसायिक समूहाला लक्ष्य करण्यात आलं. परंतु जेपीसीनं हा मुद्दा सुटणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंच सत्य सर्वोसमोर येईल. या प्रकरणी जेपीसीची आवश्यकता नाही, त्याचं काही महत्त्व नसेल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतAdaniअदानी