शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

“२२ आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत, ९ खासदारही संपर्कात”; ठाकरे गटाचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 16:34 IST

Maharashtra Politics: अनेक आमदार, मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे संपर्क करायला सुरुवात केली. काहींशी प्रत्यक्ष बोलणे झाले आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारी सुरू केली असली तर जागावाटपावरून आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहेत. दुसरीकडे ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्षही सातत्याने वाढताना दिसत आहे. यातच आता २२ आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून, ९ खासदारही संपर्कात असल्याचे मोठा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा मोठा दावा केला आहे. मीडियाशी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटाचे २२ आमदार वैतागले आहेत. हे आमदार शिंदे गटातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत आणि १३ पैकी ९ खासदार आमच्या संपर्कात आहेत. खासदारही शिंदे गटाला वैतागले आहेत. कामे होत नाहीत. तुच्छतेची वागणूक मिळत आहे. इतर कुणालाही किंमत मिळत नाही, अशी तक्रार या आमदार आणि खासदारांची आहे, असा दावा विनायक राऊतांनी केला आहे. 

शंभूराजे देसाईंनी पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला

शंभूराजे देसाईंनी पंधरा दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंना निरोप पाठवला. आमची इकडे गळचेपी होत आहे, असे शंभुराज देसाईंनी उद्धव ठाकरे यांना सांगितले. तानाजी सावंत आणि गजानन कीर्तिकर यांनी असंतोषाला वाट मोकळी करून दिली आहे. तानाजी सावंत यांना बजेट मिळत नाही. आगीतून निघून फुफाट्यात पडल्याचे ते म्हणत आहेत. भाजपने आता शिंदे गटाला नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची कोंडी झाली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. 

दरम्यान, अनेक आमदार आणि मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे संपर्क करायला सुरुवात केली आहे. काहींशी तर प्रत्यक्ष बोलणे सुद्धा झालेले आहे. त्या लोकांची नावे योग्यवेळी जाहीर करू. लवकरच बॉम्बस्फोट होणार आहे. गजानन कीर्तिकर यांनी फटाके फडोले आहेत. त्यांना दट्ट्या मिळाल्यावर ते गप्प बसतील. पण थोडे थांबा फटाक्याची माळच लागणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना