शहरं
Join us  
Trending Stories
1
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
2
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी
3
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
4
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
5
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
6
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
7
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
8
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
9
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
10
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
11
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
12
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
13
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
14
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
16
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
17
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्राला ठेंगा, बिहारला देणार भरभरून!

By admin | Published: September 28, 2015 2:23 AM

एकीकडे केंद्राच्या तिजोरीत पैसा नसल्याने महाराष्ट्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे (पीएमजीएसवाय) काम पूर्णपणे ठप्प झाले असताना मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून बिहारला

प्रमोद गवळी, नवी दिल्लीएकीकडे केंद्राच्या तिजोरीत पैसा नसल्याने महाराष्ट्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे (पीएमजीएसवाय) काम पूर्णपणे ठप्प झाले असताना मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून बिहारला याच योजनेंतर्गत २२८१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशात वाटप करण्यात आलेला हा सर्वाधिक निधी असून यावरून केंद्राचा हेतू स्पष्ट होतो.महाराष्ट्राला या योजनेसाठी केंद्राकडून यावर्षी फक्त ३६६ कोटी रुपये मिळणार आहेत. आश्चर्य हे की, गेल्या तीन आर्थिक वर्षांदरम्यान विविध ठेकेदारांनी केलेल्या २१०० कोटी रुपयांच्या कामाचा मोबदला देण्याच्या दृष्टीने कुठलेही गांभीर्य दिसत नाही. भरीसभर म्हणजे राज्य सरकारनेही सर्व कामांची नोंद केलेली नाही. केवळ ६०० कोटी रुपयांच्या पावत्यांची यादी तयार केली आहे. अर्थात ठेकेदारांचे फक्त ६०० कोटी रुपये देणे असल्याचे सरकारला दाखवायचे आहे. आता आणखी नाही...दरम्यान पीएमजीएसवाय अंतर्गत काम करणारे अकोल्याचे ठेकेदार सुमित कोठारी, नागपूरचे अश्विन मेहता आणि जळगाव जिल्ह्यातील संजय पाटील यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षात आमचे शेकडो कोटी रुपये अडकले आहेत. विशेष म्हणजे पहिले पैसे मग काम, असा या योजनेचा नियम आहे. असे असतानाही आमचे १५०० कोटी रुपयांचे बिल बाकी आहे. या योजनेंतर्गत बिलाची रक्कम मिळण्यास यापूर्वी कधीही अडचण आली नव्हती. त्यामुळे आम्ही कामे पूर्ण केली. परंतु नवे सरकार आल्यापासून आमच्या समस्या वाढल्या आहेत. काम मध्येच बंद केले तर नियमानुसार आमच्यावर एकूण खर्चाच्या १० टक्के दंड आकारण्यात येतो. त्यामुळे कुणी काम थांबविले नव्हते. पण आता शक्य नाही.