शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

ठाण्यातील वर्तकनगर रंगलेय चित्रीकरणात....

By admin | Published: May 21, 2016 3:39 AM

बोल बजरंग बली की जय... आला रे आला गोविंदा आला... अशा आरोळया देत भर उन्हात दहीहंडीला गोविंदा पथकांची सलामी...

जितेंद्र कालेकर,

ठाणे- बोल बजरंग बली की जय... आला रे आला गोविंदा आला... अशा आरोळया देत भर उन्हात दहीहंडीला गोविंदा पथकांची सलामी... तरुणांबरोबर तरुणींचेही गोविंदा पथक घोळक्या घोळक्याने बाईकवरुन येतांनाचे चित्र सध्या पहायला मिळतेय... ठाण्याच्या वर्तकनगगर भागातील महापालिका शाळेच्या मैदानासमोर...एरव्ही जुलै किंवा आॅगस्ट मध्ये साजरी होणारी दहीहंडी अर्थात गोपाळकाला वर्तकनगरमध्ये बुधवारी मोठया जल्लोषात सुरु होती. तोच उत्साह. तोच जल्लोष आणि ढोल ताशांच्या दणदणाटात दहीहंडी फोडणाऱ्या अवधूत गुप्ते दिग्दर्शित आणि विहंग प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या मराठी चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण हे वर्तकनगरच्या पोलीस वसाहतीमध्ये दिवसा आणि रात्रीच्या वेळी चित्रीत झाले आहे. गेल्या दोन आठवडयांपासून हे चित्रीकरण सुरु आहे. आणखी दोन दिवस चालणाऱ्याया चित्रीकरणातील महत्वाच्या टप्पाचा भाग बुधवारी चित्रीत झाला.गोविंदा पथकांमधील वाद, संघर्षावरील चित्रपटात गोविंदा पथके कसे एकावर एक चार ते पाच थर रचतात याचे चित्रीकरण आहे. वैभव तत्ववादी याच्यासह अनेक कलाकार मंडळींचा यामध्ये समावेश आहे. शूटींग थेट आपल्या घराच्या गॅलरीतून पहायला मिळत असल्यामुळे या भागातील तरुण तरुणींमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळत होता.काही स्थानिक तरुणांनाही दहीहंडीच्या ठिकाणी थर रचण्यासाठी काम मिळाल्यामुळे आपणही चित्रपटात दिसणार या कल्पनेने त्यांच्यातही वेगळाच सैराट जाणवत होता. >‘काहे दिया परदेस’मधील नायकसोबत सेल्फीकेवळ चित्रपटाचीच नव्हे तर सध्या एका वाहिनीवर गाजत असलेली ‘काहे दिया परदेस..’ या मालिकेचेही अधून मधून याच भागात चित्रिकरण टीएमटीच्या बस थांब्यावर करण्यात येत असते. त्यामुळे या मालिकेतील नायकाबरोबर सेल्फी घेण्यासाठीही अनेक तरुणी गर्दी करतानाचे चित्रही पहायला मिळते. ठाणे महापालिकेकडून कोणताही वेगळा कर न आकारता शूटींगसाठी सहज परवानगी मिळत असल्यामुळे सध्या वर्तकनगर भाग चित्रीकरणासाठी चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.यापूर्वीही झेडा, बालक पालक, शाळा, टाईमपास अशा अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण याच भागात झालेले आहे. एकीकडे चित्रीकरणासाठी महापालिकेकडून कोणताही महसूल घेतला जात नाही. अशा प्रकारचा महसूल जमा करण्याच्या दृष्टीने पालिका प्रस्ताव विचाराधीन आहे. अशा प्रकारे प्रस्ताव तयार झाला तर पालिकेला चित्रीकरणाच्या माध्यमातून करोडोंचे उत्पन्न मिळू शकणार असल्याची प्रतिक्रीया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.