शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

आरोपीला एवढं कडक शासन व्हावं की...; बदलापूर प्रकरणावर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 1:43 PM

त्याचार प्रकरणातील नराधमांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

NCP Ajit Pawar ( Marathi News ) :बदलापूर पूर्व येथील एका शाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरत आंदोलन छेडलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "अत्याचार प्रकरणातील नराधमांना अतिशय कडक शासन व्हायला पाहिजे. एवढं कडक शासन व्हायला पाहिजे की पुन्हा असं करण्याचं त्यांचं धाडसच नाही झालं पाहिजे आणि असं काही करण्याच्या स्थितीतच ते राहिले नाही पाहिजेत," असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, "बलात्कार प्रकरणातील कायदा केंद्र सरकारने करणं आवश्यक असतं. कारण मागे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना आम्ही शक्ती कायद्यासाठी प्रयत्न केला होता. शेजारच्या राज्यात जिथं हा कायदा बनवण्यात आला आहे, तिथंही आम्ही लोकांना पाठवलं होतं," असं अजित पवार म्हणाले. तसंच "काही लोकं म्हणतात की, मुलींनी रात्री उशिरा घराबाहेर पडू नये. मात्र मी याच्याशी अजिबात सहमत नाही. मुलांनी घराबाहेर पडलेलं चालतं, पण मुलींनीच का जाऊ नये? जो नियम मुलांना लावला जातो, तोच मुलींनाही लावला गेला पाहिजे. मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा," असं आवाहन त्यांनी केलं आहे. 

"बदलापूरची घटना घडल्यानंतर लगेचच मी तिथल्या पोलीस आयुक्तांसोबत फोनवर बोललो होतो. कोणताही हस्तक्षेप न होऊ देता आरोपीवर कडक कारवाई व्हायला हवी, असं मी त्यांना सांगितलं होतं. या प्रकरणाची फास्टट्रॅकवर सुनावणी व्हायला हवी. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबतची माहिती दिली आहे," अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbadlapurबदलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ