शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 07:39 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात विद्वेष पसरविणारी नेत्यांची विधाने आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रडारवर आली आहेत. त्यात ‘बटेंगे तो कटेंगे’सह मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या भावना भडकविणाऱ्या विधानांचाही समावेश आहे. असे सगळेच नारे, विधाने याबाबत मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केंद्रीय मुख्य आयुक्तांकडे अहवाल पाठविले आहेत. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ म्हणत विविध सभांमधून भाषणे दिली होती. भाजपच्या अन्य नेत्यांनीही हाच नारा दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादविरुद्ध धर्मयुद्ध पुकारण्याचे आवाहन केले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करताना सज्जाद नोमानी यांनी भाजपला मते देणाऱ्या मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा, असे म्हटले होते. तसेच मशिदींवर बुलडोझर चालविणाऱ्यांना मते देणार का, असा सवालही केला होता. 

मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने ‘लोकमत’ला सांगितले की, धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सर्वच वक्तव्यांबद्दलचे अहवाल केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांकडे आम्ही पाठविले आहेत. असे साधारणत: १५ अहवाल आहेत. काहींबाबत केंद्रीय आयोगाने आमच्याकडून अहवाल मागविले होते, काहींबाबत आम्ही स्वत:हून अहवाल पाठविले आहेत. त्यावर काय कारवाई करायची याचा अधिकार केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना असतात. सर्व प्रकारच्या बाबी तपासून कारवाई केली जाते.  

मतदानाच्या एकाच दिवसात दीडशे गुन्हे दाखल

३५ दिवसांच्या आचारसंहिता काळात निवडणुकीशी संबंधित ५०९ गुन्हे दाखल झाले आणि मतदानाच्या एकाच दिवसात बुधवारी १५० गुन्हे दाखल करण्यात आले.

एकूण ७०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १२३ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. गेल्यावेळेपेक्षा यंदा ५८३ कोटी रुपये अधिकची मालमत्ता (पैसे, दारू आदी) जप्त करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती आयोगाने मनाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वरळी, भायखळा, चांदिवली अशा काही मतदारसंघांमध्ये मतदानाच्या दिवशी फिरले. 

प्रत्यक्षात ठाण्यातील त्यांच्या मतदारसंघातून ते वर्षा बंगल्यावर मतदानाच्या काळात जाऊ शकतील का, याची विचारणा त्यांच्या कार्यालयाने आयोगाकडे केलेली होती.

आम्ही त्यांना मतदारसंघातच थांबण्यास सांगितले होते. मात्र, ते अन्य मतदारसंघांमध्ये गेले होते का याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस