शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर गप्प का?; उद्धव ठाकरे कडाडले, भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 13:37 IST

हे मंदिर पाडण्याचा फतवा निघतो तेव्हा भाजपा आणि फडणवीसांचे हिंदुत्व काय करतेय, नवी मुंबईत मंदिराच्या जमिनीवर सिडकोचा डोळा आहे. एक है तो सेफ है मग मंदिर कुठे सेफ आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला. 

मुंबई - बांगलादेशात जे हिंदूवर अत्याचार होतायेत त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाऊले उचलायला हवीत. जिथे अत्याचार होतायेत तिथे धमक दाखवण्याची गरज आहे. आमच्या खासदारांनी मोदींना भेटीची वेळ मागितली होती परंतु ती नाकारली गेली. पंतप्रधान खूप व्यस्त आहेत. त्यामुळे कदाचित बांगलादेशातीलहिंदूवरील अत्याचार त्यांच्या निदर्शनात आले नसतील. केंद्र सरकारने तात्काळ काय पाऊले उचलणार हे स्पष्ट करावे. संसदेत बाकीचे विषय एक दिवस बाजूला राहूद्या. बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार त्यावर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, संसदेत महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन चर्चा भरकटवली जातेय. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतायेत. २-३ महिन्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट संघ भारतात आला होता तेव्हा आदित्य ठाकरे यांनी जर त्या देशात हिंदूवर हल्ले होत असतील तर त्यांच्या क्रिकेट संघाला इथं बोलावणे योग्य आहे का असा प्रश्न केला पण त्याला काही उत्तर आले नाही. आज तमाम हिंदूतर्फे माझी पंतप्रधानांना विनंती आहे जसं आपण एका फोनमध्ये युक्रेनचं युद्ध थांबवले होते तसं बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार रोखण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. इथे बटेंगे कटेंगे करून उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवण्यात अर्थ नाही पण जिथे अत्याचार होतायेत त्यांना आपली धमक दाखवण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय ८० वर्षापासून दादर स्टेशनवर हमालांनी बांधलेल्या हनुमान मंदिराला भाजपा सरकारने नोटीस पाठवली. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं म्हटलं आहे. ८० वर्ष जुने मंदिर भाजपा पाडायला निघाले हे कुठले हिंदुत्व?, मंदिराच्या जमिनीवर सिडको डोळा ठेवते. सरकार मंदिर वाचवू शकत नाही. भाजपाचं निवडणुकीपुरतं हिंदुत्व बाकी आहेत. हिंदू केवळ मतांपुरते राहिलेत. तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?. हिंदूंची मते पाहिजे, त्यांना भयभीत करायचे आणि सरकार आल्यानंतर मंदिरे सुरक्षित कशी आहेत? बांगलादेशातही आणि मुंबईतही मंदिर सुरक्षित नाही असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. 

दरम्यान, आपल्या मुंबईतले मंदिर हमालाने कष्टाने बांधले आहे. हे मंदिर पाडण्याचा फतवा निघतो तेव्हा भाजपा आणि फडणवीसांचे हिंदुत्व काय करतेय, नवी मुंबईत मंदिराच्या जमिनीवर सिडकोचा डोळा आहे. एक है तो सेफ है मग मंदिर कुठे सेफ आहे? कटेंगे तो बटेंगे करत हिंदुंना घाबरवता कशाला?. बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाहीत, माझ्या राज्यात हिंदूची मते पाडली जातायेत. ज्या हिंदूंच्या मतांवर तुम्ही निवडून आलात ते वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आधी सरकारने सांगावे. बांगलादेशातील इस्कॉन मंदिर जाळले गेले. मुख्य पुजाऱ्याला अटक झाली. आपले विश्वगुरू काय करतायेत? शेख हसीना भारतात येऊन सुरक्षित झाल्या परंतु बांगलादेशात हिंदू असुरक्षित आहे. युक्रेनचे युद्ध थांबवणारे बांगलादेशात हिंदू अत्याचारावर गप्प का? असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. 

अजून किती राक्षसी बहुमत हवं?  भाजपा फोडाफोडीचं राजकारण करतायेत. हिंदुत्व वैगेरे झुठ आहे. अजून किती राक्षसी बहुमत हवे? सत्तेचा विस्तार करण्यासाठी केवळ हिंदूंना वापरताय का? इतके दिवस अजून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. लाज, लज्जा शरम असेल तर भाजपाने बांगलादेशात होणाऱ्या हिंदू अत्याचारावर बोलावे. दादर स्टेशनवरील मंदिर पाडण्याचा फतवा त्यावर बोलावे. त्यानंतर नवी मुंबईत मंदिराच्या जमिनीवर सिडकोचा डोळा असून तो भूखंड कोणाला देणार त्यावर बोलावे. निवडणुकीच्या निकालाबाबत लोकांना शंका आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBangladeshबांगलादेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाHinduहिंदू