शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

नवलखांचा जामीन रद्द करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय रद्दबातल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 06:02 IST

एल्गार परिषद प्रकरण : विशेष न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज रद्द करण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल केला. न्यायालयाने विशेष न्यायालयाने पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. 

विशेष न्यायालयाचा आदेश संदिग्ध असून आरोपीने सादर केलेल्या पुराव्यांचे विश्लेषण केलेले नाही, असे न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने म्हटले. जामीन नाकारताना यूएपीए कायद्याच्या कलम ४५डी (५) अंतर्गत आवश्यक असलेली कारणमीमांसा न्यायालयाने केली नाही. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात दिलेल्या निकालाचा विचार विशेष न्यायालयाने केला नाही. त्यामुळे न्यायालयाने नव्याने जामीन अर्जावर सुनावणी घ्यावी, असे म्हणत उच्च न्यायालयाने पुन्हा हे प्रकरण विशेष न्यायालयाकडे पाठविले.

५ सप्टेंबर २०२२ रोजी विशेष एनआयए न्यायालयाने नवलखा यांचा जामीन फेटाळला. त्या आदेशाला नवलखा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. गुरुवारच्या सुनावणीत अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी विशेष न्यायालयाचा ५ सप्टेंबर २०२२ रोजीचा आदेश रद्द करण्यास सहमती दर्शवित असल्याचे न्यायालयाला सांगितले. 

तर नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी विशेष न्यायालयाला जामीन अर्जावर जलदगतीने सुनावणी घेण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली. त्यानंतर न्यायालयाने विशेष न्यायालयाला चार आठवड्यांत जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चा