शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

इतिहास बदलण्याची ताकद एकनाथ शिंदे गटात नाही; शिवसेना खा. संजय राऊतांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 10:41 AM

शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय खळबळ माजली आहे हे माहिती आहे. शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत असं संजय राऊत म्हणाले.

 मुंबई - ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले. हा इतिहास बदलण्याची ताकद शिंदे गटात नाही. ज्यांना भाजपाचा पुळका होता ते पराभूत झाले. शिंदे-भाजपा सरकारला लोकशाहीची भीती आहे. बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केली आहे. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना फटकारलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान आहे. तुम्ही शिवसेना सोडली आहे. शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. स्वत:च्या हिमतीवर निवडून या. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा. शिवसेनेच्या पंखाखाली का येताय? जर स्वाभिमानासाठी बाहेर पडलाय तर शिवसेनेशिवाय स्वतंत्र्य स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका. ज्यांची हकालपट्टी करण्यात आली ते शिवसेना-भाजपा युती असताना पराभूत झाले आहेत त्यांना आता भाजपाचा पुळका आला आहे असा टोला राऊतांनी लगावला. 

तसेच बंडखोरांच्या नेत्यांना असे बोलावे लागते. शिवसेनेची ताकद आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय खळबळ माजली आहे हे माहिती आहे. शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे. इतके दिवस मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही. एक दुजे के लिए असा सिनेमा राजकारणात सुरू आहे. त्या सिनेमाचा शेवट कसा झाला सगळ्यांना माहिती आहे असंही संजय राऊत म्हणाले. 

संसदीय लोकशाहीवर हल्ला संसदीय लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. लोकशाहीची भीती सरकारला वाटत असेल तर ते देशासाठी घातक आहे. संसदेत परखड शब्दात बोलण्यावर बंदी आणली जात आहे. जर मुस्कुटदाबी करणार असेल तर देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल. लोकशाहीत गळा घोटण्याचं काम केले जात आहे. सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे पंख छाटण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे असा आरोप संजय राऊतांनी केंद्र सरकारवर लावला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे