शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची तोंडे समोर हवीत; महायुतीच्या मेळाव्यात चुकांची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 12:39 PM

निवडणुकीत महायुतीचा एकच गमछा ठेवून त्यावर तिन्ही पक्षांचे चिन्ह ठेवा असाही सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रमुख नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असू नयेत, त्यांची तोंडे एकमेकांसमोर असायला हवीत, असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी महायुतीच्या बैठकीत दिला. राज्यातील सरकारला सव्वादोन वर्षे झाली, तरीसुद्धा लोकांना महायुतीचे सरकार का हवे, हे सांगावे लागत आहे, हे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.

मायक्रो लेव्हलला लोकांचे महायुतीवरील प्रेम कमी झाले आहे. आपल्या हातून घडलेल्या चुकांचा हा परिणाम आहे. महायुतीला काठावरील नव्हे घवघवीत यश हवे असल्याने त्यासाठी एकजूट हवी, असा सल्ला आमदार गणेश नाईक यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्याच पुन्हा न करता एकमेकांशी समन्वय साधून काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

ठाण्यात बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वय मेळावा पार पडला. त्याला प्रमुख मार्गदर्शक, तसेच कोकण विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत, प्रसाद लाड, आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेत ठाणे, पालघर, कल्याण या तीन जागा निवडून आल्या, परंतु भिवंडीची जागा पडली. विधानसभा निवडणुकीत अशा चुका होता कामा नये, असा सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी दिला.

२४ ऑगस्टपासून प्रचारयात्रा : लाड

महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्टपासून प्रचार यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती लाड यांनी दिली. ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून, पालघर नवी मुंबई अशी ही यात्रा जाईल. ‘एकजूट महाराष्ट्रासाठी, अभियान विकासासाठी, कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडिया आर्मी तयार करून त्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्के : सामंत

लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह लोकापर्यंत पोहोचविण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली होती, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. कोकणात ७४ जागा असून, त्या सर्व महायुती लढणार आहे. महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्क्यांपेक्षा पुढे असेल, असा दावा त्यांनी केला.

महायुतीचा एकच गमछा

निवडणुकीत महायुतीमधील प्रत्येक पक्ष वेगवेगळा गमछा घालून प्रचार करीत असतात. त्यातून काही वेळेस नेत्यांमध्ये भांडणे होतात. महायुतीचा एकच गमछा ठेवा आणि त्यावर तिन्ही पक्षांचे चिन्ह ठेवा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस