शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
2
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
3
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
4
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
5
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
6
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
7
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
8
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम
9
“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील
10
केवळ गंमत म्हणून पाठवला सलमानला धमकीचा संदेश; झारखंडमधून एकाला बेड्या
11
"मोठी डील झालीय"; तिकीट कापल्यानंतर चंद्रिकापुरेंचे थेट पत्र; म्हणाले, "अजित पवारांनी खंजीर खुपसला"
12
IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'शरद पवारांचा मला दुरून आशीर्वाद', अजित पवार गटातील नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
14
अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 
15
“मित्रपक्षांना चालत नाही, तो चेहरा राज्याला कसा चालेल”; CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
16
एकाच मतदारसंघातून सलग ५ वेळा निवडणूक लढविणाऱ्या एकमेव महिला, दोनदा यश, तीनदा अपयश
17
"यांच्या स्वभावातच कोणाशी..."; वांद्रे पूर्वमध्ये उमेदवार देताच ठाकरेंवर झिशान सिद्दीकींची खोचक पोस्ट
18
₹९०० पर्यंत जाऊ शकतो Paytm चा शेअर, ५ महिन्यांत १२०% ची तेजी; शेअर वधारला
19
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देणारा निघाला भाजीवाला, मागितलेले ५ कोटी
20
नागिणीने घेतला खुनी बदला, एकापाठोपाठ एक ५ जणांना दंश केला, ३ जणांचा मृत्यू

Devendra Fadanvis: "महाराष्ट्राच्या 'मी पुन्हा येईन'प्रमाणेच नड्डांची घोषणा; आम्हीच येऊ, फक्त आम्हीच"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:46 AM

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून बिहारमधील सत्तांतरावर भाष्य करत नितीश कुमार यांना आगे बढो.. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई - उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देंवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभेतील शेवटच्या अधिवेशनात बोलताना मी पुन्हा येईन ही कविता म्हणून दाखवली होती. मात्र, या कवितेनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. मी पुन्हा येईन हे वाक्य महाराष्ट्रात फडणवीसांशी जोडले गेले. मी पुन्हा येईन हा फडणवीसांना विश्वास वाटत होता, पण विरोधकांनी तो त्यांचा अहंकार असल्याचं म्हटलं. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि फडणवीस पुन्हा सत्तेत आलेच नव्हते. त्यावरुनही त्यांना ट्रोल केलं गेलं. आता फडणवीसांची मी पुन्हा येईन ही घोषणा आणि जेपी नड्डा यांची आम्हीच येऊ ही घोषणा एकसारखीच असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. 

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून बिहारमधील सत्तांतरावर भाष्य करत नितीश कुमार यांना आगे बढो.. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यात, बिहारमधील भाजपच्या मेळाव्यात भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलेलं विधान देशभर चर्चेत होतं. त्या विधानापासूनच नितीशकुमार यांनी उचल खाल्ली आणि इतर पक्षांना संपवायला निघालेल्या भाजपला सत्तेतून हद्दपार केलं असे शिवसेनेनं म्हटलं आहे. यावेळी, फडणवीसांच्या मी पुन्हा येईन, या विधानाची आठवण सांगत, नड्डा यांची घोषणाही मी पुन्हा येईनसारखीच असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. 

''बिहारमध्ये सध्या तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या बरोबरीने सरकार बनवलं आहे. ही आघाडी 2024 मध्ये अशीच भक्कम राहिली तर लोकसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतात, हे सत्य आहे. महाराष्ट्रातील 'मी पुन्हा येईन' या घोषणेप्रमाणेच श्री. नड्डा यांची 'आम्हीच येऊ, फक्त आम्हीच' ही घोषणा आहे. लोकशाहीत मतपेटीच्या मार्गाने कोणीही येऊ शकेल, पण आम्हीच येऊ असे सांगणारे लोकशाही मानतात काय?, असा सवाल शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला विचारण्यात आला आहे. 

सुशील मोदींनी शिंदे गटाचा दावाच खोडला

बिहारमधील भाजपचे नेते सुशील मोदी आता बरळले आहेत की, 'शिवसेना आम्ही फोडली. जे आमच्याबरोबर राहणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील. शिवसेनेला ते भोगावे लागले.' याचा काय अर्थ घ्यायचा? शिंदे गट सांगतोय त्यावर गुळण्या टाकण्याचाच हा प्रकार. आम्ही हिंदुत्व किंवा स्वाभिमानासाठी बाहेर पडलो हा दावाच सुशील मोदी यांनी खोडून काढला. शिंदे गट शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी फोडला हे त्यांनी जाहीर केल्यावर सगळय़ांचेच वस्त्रहरण झाले! पण आता त्यांच्याच बिहारमध्ये नितीश कुमार भाजपपासून दूर झाले. त्यावर काय बोलणार आहात?

राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो

शिवसेनेप्रमाणे नितीश कुमारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न तुम्ही केला तेव्हा कुमारांनी उलटा तुम्हालाच डंख मारला हेच सत्य आहे. नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली. त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. 'ईडी' आणि 'सीबीआय'देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही. तेजस्वी यादवही बेधडक आहेत. सत्तेचा अमरपट्टा बांधून कोणीच जन्मास आले नाही. प्रत्येकाला सिंहासनावरून कधी तरी उतरायचे आहे. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे! समझने वालों को इशारा काफी है! 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना