शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

मंत्रालयातील टेलिफोनची ट्रिंग-ट्रिंग थांबली; ८० टक्के फोन ८ दिवसांपासून पडलेत बंद

By दीपक भातुसे | Published: August 15, 2024 12:54 PM

संपर्क करणे झाले अवघड, कर्मचाऱ्यांची पायपीट

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: संपूर्ण राज्याचा प्रशासकीय कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातील ८० टक्के दूरध्वनी आठ दिवसांपासून बंद असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंत्रालयातील दूरध्वनीवर बाहेरून फोन येणे बंद आहे, तर मंत्रालयातून फोन केला तर समोरील व्यक्तीचा आवाजच ऐकायला येत नाही. विविध विभागांनी एमटीएनएलकडे तक्रार  केली. मात्र,  तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून बोळवण करण्यात आल्याचे समजते.

संपर्क करणे झाले अवघड

मंत्रालयातील विविध विभागांत संपर्क करायचा असेल तर अधिकारी, कर्मचारी दूरध्वनीचा वापर करतात, कारणविभागांच्या दूरध्वनी क्रमांकाची यादी त्यांच्याकडे असते. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात त्यामुळे संबंधित विभागात संपर्क करायचा तर अधिकाऱ्यांचा मोबाइल क्रमांक असूनही उपयोग नसतो. त्यामुळे दूरध्वनीवरच संपर्क करणे सोपे जाते. मात्र, मागील आठ दिवसांपासून कोणत्याही विभागात संपर्क करणे अधिकारी, कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे. 

कर्मचाऱ्यांची पायपीट

अनेकदा एखाद्या विभागातून काही माहिती मागवायची असेल, फाईल मागवायची असेल, एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर दूरध्वनी बंद असल्याने थेट त्या विभागात जावे लागत आहे. यामुळे अधिकारी आणि कर्मचारीही त्रासले आहेत. याशिवाय मंत्रालयाच्या बाहेर आणि संपूर्ण राज्यातून प्रशासकीय यंत्रणेला मंत्रालयातील विविध विभागांत दूरध्वनीद्वारे संपर्क करणे अवघड झाले आहे.

तेव्हा गाडी पाठवावी लागली

यापूर्वी एकदा मुख्यमंत्री कार्यालयातील दूरध्वनी बंद झाले होते, तेव्हा गाडी पाठवून एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयात आणून दूरध्वनी दुरुस्त करून घेतले होते.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMTNLएमटीएनएल