शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

Monsoon Update: येत्या पाच दिवसांत वाढणार मान्सूनचा जोर, मुंबई, ठाण्यात मुसळधार कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 7:24 AM

Monsoon Update: मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी आजही निम्मा महाराष्ट्र कोरडा आहे. मात्र, आता हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबई : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी आजही निम्मा महाराष्ट्र कोरडा आहे. मात्र, आता हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषत: मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पावसाने शुक्रवारी उघडीप घेतली. गुरुवारी सकाळी मात्र पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला होता. दुपारी आणि सायंकाळी त्याने उघडीप घेतली आणि शुक्रवार सायंकाळपर्यंत कोरडा गेला. मुंबईतला पाऊस गायब होताच, येथील उन्हात आणि उकाड्यात वाढ झाली असून, वाहणाऱ्या घामाच्या धारांनी मुंबईकर ओलेचिंब होत आहेत.

नेमका अंदाज काय?n कोकण, गोव्यात १९ ते २१ जूनदरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.n मध्य महाराष्ट्रात २० आणि २१ जून रोजी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.n विदर्भात १८ ते २१ जूनदरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस.

पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.    - कृष्णानंद होसाळीकर,     अतिरिक्त महासंचालक, भारतीय     हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई