शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान
2
Pager Explosion : पेजरमध्ये बसवून घडवले स्फोट, ते PETN स्फोटक काय?
3
Ganesh Visarjan 2024 Live: 'लालबागचा राजा'चं विसर्जन; साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप
4
'बुलडोझर' कारवाईला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक; आदेशात नेमकं काय म्हटलंय? जाणून घ्या
5
"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस", मंगलप्रभात लोढा यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं कौतुक! 
6
"...याला म्हणतात मनाने मोठा असलेला माणूस", प्रसाद ओकने सांगितला मुख्यमंत्री शिंदेंचा 'तो' किस्सा
7
Video: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चाहतीला अश्रू अनावर, अरिजीत सिंहने काय केलं पाहा; होतंय कौतुक
8
अशी सुरू झाली होती सलमान-ऐश्वर्याची लव्हस्टोरी, सोमी अली म्हणाली- "नोकरांनी सांगितलं की..."
9
'शरद पवारांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा...'; अशोक सराफ यांनी सांगितला मजेशीर किस्सा
10
केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार?
11
Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!
12
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
13
EPFO Calculation: दर महिन्याला केवळ 'इतकं' योगदान, नंतर तुमच्या पीएफ खात्यात जमा होती ३ ते ५ कोटी; पाहा कॅलक्युलेशन
14
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
15
Video: आर्या जाधवची अमरावतीत रॅली, सादर केलं रॅप; चाहत्यांचा तुफान प्रतिसाद
16
IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी
17
"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..."
18
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
19
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
20
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी

"एकच गोष्ट चांगली होऊ शकते, ती म्हणजे..."; शिंदे, केसरकरांना जयंत पाटलांचे किल्ल्यावरून उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 3:08 PM

Rajkot fort News: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण तापले आहे. राजकोट किल्ल्यावर झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानांना जयंत पाटलांनी उत्तर दिले.

Jayant Patil Rajkot Fort News Marathi: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडल्याच्या मुद्द्यावरून राजकारणात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या विधानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला. 

"सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली पाहिजे. बांधकाम खात्याने केलेला भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे", अशी मागणी जयंत पाटील यांनी राजकोट किल्ल्यावरील आंदोलनावेळी महायुती सरकारला लक्ष्य केले.  

'एक झाड पडले नाही, पुतळा पडला', जयंत पाटलांचा उलट सवाल

ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने पुतळा पडला असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले, "दुर्दैव आहे की, अशा पद्धतीची लोक महाराष्ट्रात राज्य करत आहेत. ४५ प्रति किमी वेगाने वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. अहो, त्या दिवशी ४८ किमी वेगाने वारे वाहत होते. एकही झाड या भागात पडले नाही. पुतळा पडला."

"ज्या बाजूने वारे येत होते, त्याच बाजूने पडला. या सगळ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खाते आणि महाराष्ट्र सरकारची आहे. एकनाथ शिंदेंची आहे. या राज्याच्या बांधकाम मंत्र्‍यांची आहे. स्वतंत्र चौकशी या घटनेची झाली पाहिजे", असे जयंत पाटील म्हणाले.  

जयंत पाटलांचा केसरकरांवर पलटवार 

"या भागातील मंत्री म्हणतात की काहीतरी चांगले घडायचे असेल... हो, एकच गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली होऊ शकते, ती म्हणजे महायुतीचे सरकार महाराष्ट्रातील जनता गाडून देईन आणि पुन्हा एकदा जनतेचे राज्य आणण्याचा प्रयत्न आपण सगळे करूया", असे म्हणत जयंत पाटलांनी दीपक केसरकरांना उत्तर दिले.  

राजकोट किल्ल्यावरील राड्यावर जयंत पाटील म्हणाले...

"छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत जी दुर्घटना घडली, तिथे गेलो. त्याठिकाणी कोणताही अभिनिवेश आमच्या कुणातही नव्हता. ही दुःखद घटना आहे. या घटनेची पाहणी करण्यासाठी राज्यातून लोक येणार होती. पण, दुर्दैवाने झाला तो प्रकार हा निषेधार्ह आहे. लोकशाही ऐवजी झुंडशाही महाराष्ट्रात निर्माण करणे. लोकांमध्ये भय निर्माण करणे, हे महाराष्ट्रावर सत्ता असणारी लोक करणार आहेत. महाराष्ट्रातील जनता झालेल्या दुर्घटनेचा जाब या सरकारला विचारल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा जयंत पाटलांनी दिला.

टॅग्स :RaigadरायगडJayant Patilजयंत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर Politicsराजकारण