शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
2
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
3
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
4
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
5
खेकड्यांनी धरण पोखरलेले, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
6
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
7
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
8
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
9
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
10
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
11
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
12
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
14
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
15
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
16
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
17
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
18
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
19
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
20
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने

महायुतीच नाही मविआच्या काळातही महिला अत्याचार घटनांनी गाठला होता कळस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 8:55 PM

बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवरीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे

Maharashtra Women Safety NCRB Report : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. बदलापुरच्या या घटनेनंतर राज्यात आणखी अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशातच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून महाराष्ट्राबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असो किंवा महायुतीचे महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांमध्ये दोघांच्या काळात कोणताही बदल झाला नसल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आलं आहे.

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. या घटनेच्या संदर्भात एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीतून महाराष्ट्रात महिलांवर खुलेआम होणाऱ्या अत्याचाराचे भीषण सत्य समोर आले आहे. 2२०२१ मध्ये कोविड-१९ च्या काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिलांवरील गुन्ह्यांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात दररोज सरासरी १०९ महिला अत्याचाराला बळी पडत होत्या. आजही परिस्थिती तशीच असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आलं आहे. २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत, ही संख्या १२६ पर्यंत वाढली. २०२३ मध्येही परिस्थिती अशीच होती.

एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीनुसार,  लॉकडाऊन दरम्यान महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या ३१,७०१ गुन्ह्यांची नोंद झाली. याचा अर्थ दररोज सरासरी ८८ महिला अत्याचाराच्या बळी ठरत होत्या. २०२१ मध्ये ही संख्या ३९,२६६ पर्यंत वाढली. त्यावेळी दररोज १०९ महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या होत्या.

जानेवारी ते जून २०२२ या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात दररोज १२६ महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. तर जुलै ते डिसेंबर २०२२ मध्ये महायुती सरकारच्या काळात ही संख्या थोडी कमी होऊन ११६ वर आली. मात्र, २०२३ मध्ये ही सरासरी पुन्हा १२६ वर पोहोचल्याने राज्यातील महिलांच्या सुरक्षेची स्थिती अजूनही गंभीर असल्याचे स्पष्ट झालं. दुसरीकडे, अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२१ पर्यंत ही संख्या २४९ वर पोहोचली होती आणि २०२२ मध्ये ती ३३२ पर्यंत वाढली होती.

मुंबईत २०२३ मध्ये पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराच्या घटनांमध्ये थोडीशी घट झाली आहे. २०२० मध्ये पोस्कोची ४४५ प्रकरणे नोंदवली गेली. तर २०२१ मध्ये ही संख्या ५२४ वर पोहोचली होती. २०२३ मध्ये हा आकडा ५९० वर पोहोचला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये कोणतीही लक्षणीय घट झाली नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही घटनांमध्ये वाढ तर काही घटली असली तरी एकूण परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजनांची तातडीने गरज असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCrime Newsगुन्हेगारी