शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महायुतीच नाही मविआच्या काळातही महिला अत्याचार घटनांनी गाठला होता कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 20:55 IST

बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवरीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे

Maharashtra Women Safety NCRB Report : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. याप्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आलीय. बदलापुरच्या या घटनेनंतर राज्यात आणखी अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशातच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून महाराष्ट्राबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असो किंवा महायुतीचे महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांमध्ये दोघांच्या काळात कोणताही बदल झाला नसल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आलं आहे.

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. या घटनेच्या संदर्भात एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीतून महाराष्ट्रात महिलांवर खुलेआम होणाऱ्या अत्याचाराचे भीषण सत्य समोर आले आहे. 2२०२१ मध्ये कोविड-१९ च्या काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिलांवरील गुन्ह्यांच्या संख्येत कोणतीही घट झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात दररोज सरासरी १०९ महिला अत्याचाराला बळी पडत होत्या. आजही परिस्थिती तशीच असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आलं आहे. २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत, ही संख्या १२६ पर्यंत वाढली. २०२३ मध्येही परिस्थिती अशीच होती.

एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीनुसार,  लॉकडाऊन दरम्यान महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन दरम्यान, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या ३१,७०१ गुन्ह्यांची नोंद झाली. याचा अर्थ दररोज सरासरी ८८ महिला अत्याचाराच्या बळी ठरत होत्या. २०२१ मध्ये ही संख्या ३९,२६६ पर्यंत वाढली. त्यावेळी दररोज १०९ महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या होत्या.

जानेवारी ते जून २०२२ या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात दररोज १२६ महिला अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. तर जुलै ते डिसेंबर २०२२ मध्ये महायुती सरकारच्या काळात ही संख्या थोडी कमी होऊन ११६ वर आली. मात्र, २०२३ मध्ये ही सरासरी पुन्हा १२६ वर पोहोचल्याने राज्यातील महिलांच्या सुरक्षेची स्थिती अजूनही गंभीर असल्याचे स्पष्ट झालं. दुसरीकडे, अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२१ पर्यंत ही संख्या २४९ वर पोहोचली होती आणि २०२२ मध्ये ती ३३२ पर्यंत वाढली होती.

मुंबईत २०२३ मध्ये पोस्को कायद्यांतर्गत बलात्काराच्या घटनांमध्ये थोडीशी घट झाली आहे. २०२० मध्ये पोस्कोची ४४५ प्रकरणे नोंदवली गेली. तर २०२१ मध्ये ही संख्या ५२४ वर पोहोचली होती. २०२३ मध्ये हा आकडा ५९० वर पोहोचला आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये कोणतीही लक्षणीय घट झाली नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही घटनांमध्ये वाढ तर काही घटली असली तरी एकूण परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजनांची तातडीने गरज असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCrime Newsगुन्हेगारी