शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

जिल्हा परिषदेपाठोपाठ पशुसंवर्धन विभागातील भरती रद्द, राज्य सरकारने जारी केला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 8:41 AM

२०१७ आणि २०१९ मध्ये जाहीर झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय

दीपक भातुसे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकीकडे ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली असतानाच दुसरीकडे यापूर्वी जाहीर केलेल्या आणि जाहीरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागवलेल्या भरती प्रक्रिया रद्द करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. यापूर्वी १३ हजार ५२१ पदांची जिल्हा परिषदेची भरती सरकारने रद्द केली होती. मंगळवारी पशुसंवर्धन विभागाची २०१७ आणि २०१९ मध्ये जाहीर झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय विभागाने जारी केला आहे.

पशुसंवर्धन आयुक्तलांतर्गत सरळसेवा कोट्यातील गट क आणि ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत आधी २०१७ आणि नंतर मार्च २०१९ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पशुवसंर्धन विभागातील ७२३ पदांसाठी ही जाहीरात काढण्यात आली होती. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. पैसे भरून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जही भरले. मात्र त्यानंतर आजपर्यंत मागील चार वर्ष या उमेदवारांच्या वाट्याला प्रतिक्षेशिवाय काहीच आले नाही. अखेर जिल्हा परिषदेप्रमाणे शासनाने ही भरतीही रद्द केली.

ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती होणार?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाकरता पदभरतीवरील निर्बंधांमध्ये राज्य सरकारने शिथिलता दिली आहे. ही शिथिलता १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू आहे. त्यामुळे ही शिथिलता संपण्याच्या मुदतीच्या आत म्हणजेच ऑगस्ट २०२३ पूर्वी या पदांची भरतीची कार्यवाही करण्याच्या सूचना सरकारने पशुसंवर्धन आयुक्तांना दिल्या आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र