शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

नेत्याच्या मुलासाठी यंत्रणा वेगाने धावली पण बेपत्ता ८ हजार जणांचा शोध कोण घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:19 IST

नेत्यासह उद्योजकाच्या मुलाचे अपहरण झाल्यावर यंत्रणा काय करते, हे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रकरणावरून समोर आले आहे. 

सोमनाथ खताळ बीड : माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याचे समजून बँकॉकला जाणारे विमान परत फिरविले. त्यासाठी यंत्रणा आणि संपूर्ण सरकार कामाला लागले. परंतु, राज्यातील रहिवासी असलेले ८ हजार ५२ लोक जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध कोण घेणार? असा सवाल आता विचारला जात आहे.  

प्रेमप्रकरण, राग, घरगुती भांडण अशा विविध कारणांमुळे लहान मुलांसह वृद्ध घर सोडतात. याची पोलिस ठाण्यात मिसिंग म्हणून नोंदही होते. परंतु, त्यांचा शोध लागावा, यासाठी फारशी पावले उचलली जात नाहीत. इकडे नातेवाईक अन्नपाणी सोडतात, शोधासाठी पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवतात. पण पोलिस यंत्रणा आणि शासनाला याचे गांभीर्य नसते. मात्र, नेत्यासह उद्योजकाच्या मुलाचे अपहरण झाल्यावर यंत्रणा काय करते, हे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रकरणावरून समोर आले आहे. 

सरकारचे लक्ष आहे का? चालू वर्षातील १२ फेब्रुवारीपर्यंत राज्यात १८ वर्षांवरील ७ हजार ४८१ तर अल्पवयीन ५७१ लोक बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध लागलेला नाही. 

सामान्यांसाठी वेगळा न्याय का?घरातून एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यावर तक्रार देण्यासाठी गेल्यास पोलिस ठाण्यात तासनतास बसवून ठेवले जाते. परंतु, माजी मंत्र्याच्या मुलाचा शोध घेण्यासाठी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एवढेच नव्हे तर आपले राजकीय वजन वापरून बँकॉकला जाणारे विमान परत पुण्यात बोलावण्यात आले. नेत्यांसाठी एक आणि सामान्यांसाठी वेगळा न्याय का? असा सवाल सरकारला विचारला जात आहे.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंTanaji Sawantतानाजी सावंत