शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

"टक्केकवारीमध्ये पुढे पुढे करणाऱ्या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 3:10 PM

Vijay Wadettiwar Criticize Mahayuti Government: फक्त टक्केवारी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.बिमार आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबाच्या वेदना या महायुती सरकारला शाप म्हणून लागतील, असा टोला विजय वडेट्टीवार () यांनी लगावला. 

मुंबई - गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एका गर्भवती महिलेला चरवीदंड येथून खाटेची कावड करून पुराच्या पाण्यातून आणि जंगलातील पायवाटेने दोन किलोमीटरपर्यंत लेकुरबोडी गावापर्यंत न्यावे लागले. गर्भवती महिला कशीबशी जिल्हा रुग्णालयात पोहोचली; पण प्रसूतीनंतर बाळ दगावले. या घटनेमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचे वाभाडे काढले.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे बिमार झाली आहे.  एकीकडे ‘लाडकी बहिण‘ योजनेच्या प्रचार प्रसाराकरीता २७० कोटी रुपये खर्च होत असताना अश्या घटना पुढे येत असल्याने राज्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कुठे मुलाला आपल्या वडिलांना घेऊन जावे लागते तर कुठे गरोदर महिलेला कावड करून रुग्णालयात न्यावे लागत आहे.एका मागून एक अशा घटना घडत आहे, पण या सरकारला आणि प्रशासनाला पाझर काही फुटत नाही.फक्त टक्केवारी मध्ये पुढे पुढे करणाऱ्या या ट्रिपल इंजिन सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.बिमार आरोग्य व्यवस्थेमुळे जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबाच्या वेदना या महायुती सरकारला शाप म्हणून लागतील, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार