शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

...तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात; भाजपाच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 10:35 PM

ते चांगले आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे वक्तव्य करतात त्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून असते असं दानवेंनी सांगितले

मुंबई - राज्यात मुख्यमंत्रिपदावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. २०१९ च्या राजकारणात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपाचे बिनसले आणि उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणले. कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री बनले. आता अजित पवार यांनाही मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. त्यात भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजितदादाही मुख्यमंत्री होऊ शकतात असं विधान केले आहे. 

मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या वेळीस काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढले, राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या त्यावेळीही अजित पवारांना मुख्यमंत्री होता आले नाही. राजकारणातील ही घटना सगळ्यांना माहिती आहे. दावा करणे आणि बहुमत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर बहुमताच्या बाजूने अजित पवार आले किंवा १०-२० वर्षांनी कधी त्यांना बहुमत मिळाले तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात. ते चांगले आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ते जे वक्तव्य करतात त्याकडे सध्या राज्याचे लक्ष लागून असते असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले अजित पवार?‘२०२४ मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, ‘२०२४ काय आत्ताही मुख्यमंत्री बनण्याची तयारी आहे. राज्याचा मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल असं विधान करून अजित पवार यांनी धमाल उडवून दिली आहे. मात्र, कोणत्या सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हायला आवडेल, हे मात्र पवार यांनी सांगितले नाही. त्यामुळे गुढता कायम आहे. भाजपा प्रवेशाविषयी कोणताही खुलासा पवार यांनी केला नाही.

२००४ साली संधी गेलीराष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही. २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळेल एवढी संख्या जनतेने दिली होती. परंतु राजकीय जीवनात काम करताना काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी ते सांगतील तसं ऐकावे लागते. त्यामुळे २००४ मध्ये राष्ट्रवादीच्या ७१ तर काँग्रेसच्या ६९ जागा आल्या होत्या. काँग्रेसच्या लोकांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद जाईल ही मानसिकता केली होती. पण दिल्लीत काय घडले माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद येणार, विधिमंडळाचा नेता म्हणून आम्ही बहुमताने आर.आर पाटलांची निवड केली होती. त्यातून कदाचित मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आले असते तर २००४ मध्ये विधिमंडळ नेता म्हणून आर आर पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री म्हणून झालेले पाहिले असते असंही अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारraosaheb danveरावसाहेब दानवेNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री