शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘...तर काँग्रेस दोन-चार नेत्यांचाच पक्ष राहील’, चव्हाणांना उशिरा शहाणपण सुचले', विखे-पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:25 AM

ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.

शिर्डी : ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा दिलेला राजीनामा ही पक्षांतर्गत बाब असली तरी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काँग्रेस नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अन्यथा हा पक्ष चार-दोन नेत्यांचाच राहील, असे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले.काँग्रेस पक्षात लोकशाहीसाठी यापूर्वी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनीही संघर्ष केला होता. मात्र, त्यांनाही त्याची किंमत चुकवावी लागली होती. याची आठवणही त्यांनी पत्रकारांशी बोलताना करून दिली.शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री विखे म्हणाले की, मी जेव्हा काँग्रेस पक्ष सोडला, त्यावेळीही अशीच परिस्थिती होती. यामध्ये बदल न झाल्यामुळेच पक्षाचे असंख्य नेते आता बाहेर पडत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलेले मत म्हणजे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे.

आता उरलेले आमदार तरी सांभाळाशिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या झालेल्या युतीबाबत विखे म्हणाले, शिवसेनेने कोणाबरोबर युती करावी, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे; परंतु आता जनाधार गमावलेल्यांना कोणाचा तरी आधार शोधण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी केलेली युती मान्य नसल्यामुळे चाळीस आमदार तुमच्यापासून दूर गेले. नव्या युतीमुळे उर्वरित आमदार तरी तुमच्या जवळ राहतील का?, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावे, असे विखे म्हणाले.

 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस