शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

...तर भूसंपादन विधेयकावर चर्चा करा

By admin | Published: April 13, 2015 4:56 AM

भूसंपादन विधेयकाच्या मुद्द्यावर आमची बाजू बरोबर आहे आणि आंदोलनकर्ते चुकीचे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल तर त्यांनी या

पुणे : भूसंपादन विधेयकाच्या मुद्द्यावर आमची बाजू बरोबर आहे आणि आंदोलनकर्ते चुकीचे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल तर त्यांनी या विधेयकाबाबत आमच्यासोबत जाहीरपणे चर्चा करावी आणि हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे कसे ते पटवून द्यावे, असे आव्हान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पुण्यात दिले. भूमी अधिग्रहण विधेयक आणि त्या विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा, यावर चर्चा करण्यासाठी अण्णांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यांतील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची बैठक गांधी भवनात घेण्यात आली. बैठकीनंतर ते बोलत होते. भूसंपादन विधेयकाबाबत सरकार बरोबर आणि आंदोलनकर्ते चुकीचे, असे पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर त्यांनी या विधेयकावर जाहीर चर्चा करावी़ प्रसारमाध्यमांद्वारे ही चर्चा सामान्य जनतेपर्यंत पोचायला हवी, म्हणजे दोघांचीही बाजू त्यांना कळेल आणि भूसंपादन विधेयक नेमके कोणाच्या हिताचे आहे, ते जनतेच्या लक्षात येईल.राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेल्या या विधेयकाच्या अध्यादेशात केवळ शब्दांची फेरफार केली गेली, असा आरोप अण्णांनी केला. भूसंपादन विधेयकाविरोधात देशपातळीवर आंदोलन करणार असल्याचेही अण्णांनी या वेळी जाहीर केले. सरकारच्या आगामी अधिवेशनाच्या आसपास हे आंदोलन होणार आहे. नवी दिल्लीत अण्णा आंदोलन करतील, याच वेळी प्रत्येक जिल्ह्यात, गावपातळीवरही आंदोलन करण्यात येईल. याच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत बैठक होणार आहे. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विनायक पाटील, विक्रांत पाटील, कमांडर नीती यांच्यासह १५ राज्यांतील शेतकरी संघटनांचे ६३ नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)