शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

...तर आयपीसी ३०६ लावू नका

By admin | Published: December 30, 2015 1:17 AM

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एखाद्यावर नोंदवण्यापूर्वी संबंधिताने आत्महत्या करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप यापुढे पोलिसांना नोंदवावा लागणार आहे. एका इंजिनीअरची या आरोपातून

मुंबई : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप एखाद्यावर नोंदवण्यापूर्वी संबंधिताने आत्महत्या करण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप यापुढे पोलिसांना नोंदवावा लागणार आहे. एका इंजिनीअरची या आरोपातून सुटका करताना उच्च न्यायालयाने हा निर्वाळा दिला. ही नोंद न केल्यास आयपीसी ३०६ हे कलम लावू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.महावितरणमध्ये सहायक अभियंते म्हणून काम करत असलेले किशोर शिंदे यांच्यावर कनिष्ठ तंत्रज्ञ दिलीप मगर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २० मार्च २०१४ रोजी दिलीप मगर आणि एस.बी. भामगर हे महावितरणाचे तंत्रज्ञ हडपसर येथील एक वायर नीट करण्यासाठी गेले. त्यासाठी भामगर इलेक्ट्रिक पोलवर चढले तेव्हा त्यांना विजेचा शॉक बसला. ४ एप्रिल रोजी भामगर यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे मगर यांना नैराश्य आले आणि या नैराश्यातूनच त्यांनी ८ एप्रिल २०१४ रोजी आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भामगर यांच्या मृत्यूमुळे ते खूप अस्वस्थ झाल्याचे लिहिले होते. तसेच शिंदे आणि आणखी दोन वरिष्ठ सारखे छळवणूक करत असल्याचा आरोपही मगर यांनी सुसाईड नोटद्वारे केला होता. त्यांच्या सुसाईड नोटची दखल घेत पोलिसांनी शिंदे आणि अन्य दोघांवर मगर यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. हा खटला रद्द करण्यात यावा, यासाठी शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे होती.‘भारतीय दंडसंहिता कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गतगुन्हा नोंदवायचा असल्यास आरोपीने पीडिताला आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा आरोप नोंदवणे आवश्यक आहे. आत्महत्या करण्यासाठी त्याने काहीतरी मदत करणे किंवा काहीतरी बेकायदेशीर कृत्य केलेले असणे आवश्यक आहे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.‘आरोपीमुळेच पीडित व्यक्तीने आत्महत्या केली, हे सिद्ध करणे आवश्यक आहे. पीडित व्यक्तीने आत्महत्या करणे, हाच आरोपीचा हेतू असणे आणि त्यादृष्टीने त्याने बेकायदेशीर कृत्य करणे, हे सिद्ध होणेही आवश्यक आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.या केसमध्ये मगरला त्याचा सहकारी मृत्यू पावल्याचा मानसिक धक्का बसला होता. शिंदेने त्यांना आत्महत्या करण्यास चिथावणी दिल्याचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. (प्रतिनिधी)