शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

“...तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पंतप्रधान झाले असते”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 18:17 IST

Ramdas Athawale News: राहुल गांधी असेपर्यंत आम्हाला चिंता नाही. २०२९ मध्येही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Ramdas Athawale News: संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान होते. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी स्वतः म्हटले आहे की, तुम्ही संविधानाचे शिल्पकार आहात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर अजून १० ते १५ वर्ष असते, तर ते पंतप्रधान झाले असते, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये ९९ टक्के दहशतवादी हल्ले कमी झाले, त्यामुळे सद्यस्थितीत खूप शांतता आहे. काँग्रेसच्या काळात ३७० कलम हटवले असते तर अजून जम्मू काश्मीरमध्ये जास्त विकास झाला असता. केंद्र सरकारने वक्फ विधेयकात केलेले बदल हे मुस्लिम विरोधी नाही. तर मुस्लिमांना सधन करण्यासाठी आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने यासंदर्भात मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण केले जात असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.

२०२९ मध्येही नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानात बदल करणारे नाहीत. पंतप्रधान मोदी सक्षम आहेत. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते असले तरी ते अनावश्यक ठिकाणी मुद्दे उपस्थित करून काँग्रेसची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. राहुल गांधी आहेत, तोपर्यंत आम्हाला चिंता नाही. कारण २०२९ मध्येही एनडीएचे सरकार येणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत आणि मीही मंत्री होईन, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. आत्ता परिस्थिती नसली तरी भविष्यात आश्वासनांची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही रामदास आठवले यांनी दिली. तसेच औरंगजेब कबरीचा वाद हा छावा चित्रपट पहिल्यानंतर वाद समोर आला. सर्व धर्मांमध्ये बंधू भाव वाढविण्यासाठी संविधान आहे. आणि हा वाद जास्त वाढू नये, असे माझे मत आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी